शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार
3
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
4
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
5
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
6
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
7
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
8
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
9
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'
10
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
11
रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?
12
Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा...
13
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
14
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
15
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
16
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
17
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
18
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
19
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
20
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट

ताडबोरगाव-सोमठाणा रस्ताचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:31 AM

ताडबोरगाव : वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कार्यारंभ आदेश मिळूनही ताडबोरगाव- सोमठाणा या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. परिणामी ...

ताडबोरगाव : वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कार्यारंभ आदेश मिळूनही ताडबोरगाव- सोमठाणा या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. परिणामी या रस्त्यावर येणाऱ्या आठ गावांना तब्बल १२ कि.मी.चा वळसा घालून जिल्ह्याचे शहर गाठावे लागत आहे. मानवत तालुक्यातील ताडबोरगाव -सोमठाणा हा साडेपाच किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. २१ वर्षांपूर्वी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळामार्फत १६ लाख रुपये खर्च करून या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले होते . हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग असून, परिसरातील आठ गावांना हा मार्ग वाहतुकीसाठी सोयीचा आहे. २१ वर्षांत या रस्ताची एकादाही दुरुस्ती झालेली नसल्याने सध्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून, रस्त्यावरील गिट्टी ठिकठिकाणी उघडी पडली. यामुळे या मार्गावरून दुचाकी चालविणेदेखील जिकरीचे झाले आहे. परिसरातील आठ गावांतील नागरिकांना परभणीला जाण्यासाठी कोल्हा पाटी येथून बारा किलोमीटर अंतराचा वळसा घालून जावे लागत आहे. अपव्यय होत आहे. विशेषता या भागात आरोग्यविषयक सेवा उपलब्ध नसल्या कारणाने रुग्णास परभणी येथे उपचारासाठी घेऊन जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या भागातील ग्रामस्थांच्या मागणीवरून साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्ता कामास फेब्रुवारी २०२० मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तसेच या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या; परंतु, कोरोना साथीमुळे निविदाप्रक्रिया रखडली होती. तद्नंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित कंत्राटदारास कार्यारंभ आदेशही देण्यात येऊनही अद्यापही कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही . याबाबत अभियंता रवी शिराढोणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध झाले नाहीत. दरम्यान, या रस्ताचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.

आठ गावांना होणार लाभ

सध्या रस्ताची दुरवस्था झाल्याने या गावातील नागरिकांना कोल्हा पाटीमार्गे ताडबोरगाव गाठावे लागते. या मार्गाचे काम झाल्यास सोमठाणा, आटोळा, कोथाळा पार्डी, शेवडी जहांगीर, नरळद, नीलवर्ण टाकळी, राजुरा या आठ गावांचे परभणीचे अंतर तब्बल बारा किलोमीटरने कमी होणार आहे. या आठ गावांना हा साडेपाच किलोमीटरचा मार्ग ताडबोरगाव येथे राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. यामुळे वेळेची बचत होऊन वाहतूक सुलभ होणार आहे.