Raj Yoga Palmistry : तुमच्या भाग्यात राजयोग आहे का? हे स्वतःच तपासून घ्या; 'अशी' बघा हस्तरेषा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 07:00 AM2023-07-04T07:00:00+5:302023-07-04T07:00:06+5:30

Palmistry: हस्तरेषा शास्त्रानुसार मनुष्याचे भाकीत वर्तवले जाते. कारण त्या रेषा त्यावर आढळणारी चिन्हे व्यक्तीच्या जीवनाबद्दल विशेष माहिती देतात. ती माहिती जाणून घेण्यास आपणही उत्सुक असतो. या लेखाच्या माध्यमातून आपण थेट राजयोग आपल्या आयुष्यात आहे का, हे तपासून पाहणार आहोत. त्यासाठी दिलेल्या माहितीनुसार स्वतःच्या तळहाताचे निरीक्षण करा.

कुंडली शास्त्रात, हस्तरेखा शास्त्रात काही योग असे असतात जे तुमचे जीवन पालटून टाकतात. उदा. ज्यांच्या नशिबात राजयोग असतो, अशी माणसं गरीब घरात जन्माला आली तरी गरिबीत मरत नाहीत, तर त्यांच्या वाट्याला राजवैभव येते. तसेच ज्यांच्या नशिबात गजयोग असतो त्यांना अपार प्रसिद्धी मिळते. जाणून घेऊया अशाच काही योगांविषयी आणि ते योग आपल्या नशिबात आहेत का, त्याविषयी!

तळहातातील मणिबंधापासून सुरू होणारी रेषा जेव्हा शनि पर्वतावर जाते आणि त्यासोबत सूर्याचा पर्वतही उंचावलेला दिसतो, तसेच त्यावर सूर्य रेषाही गडद दिसते. शिररेषा, आरोग्यरेषा आणि वयरेषा असते. तेव्हा गजलक्ष्मी योग घडतो. ज्या व्यक्तीच्या तळहातावर असा योग तयार होतो, त्याला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दोन्ही तळहातामध्ये ही रेषा असणे खूप चांगले असते. असे लोक गरीब कुटुंबात जन्म घेऊनही खूप श्रीमंत होतात. अशा व्यक्तीचे वर्तन कार्यक्षम आणि सदाचारी असते, त्याला त्याच्या मेहनत आणि समर्पणातून खूप प्रगती आणि लाभ मिळतो.

तळहातावर शनी पर्वताचा उंचवटा दिसतो. मणिबंध किंवा चंद्र पर्वतातून निघणारी स्पष्ट रेषा इथे थांबते, तर हा शुभ योग असतो. त्यावर सूर्य रेषा गडद आणि ठळक दिसते. त्यासोबतच शिररेषा, आरोग्यरेषा आणि वयरेषा गडद रंगाची दिसते. अशी रेषा दोन्ही तळहातावर असणे अधिक भाग्यकारक समजले जाते. ते मेहनतीने यशस्वी होतात. ज्या व्यक्तीच्या तळहातावर हा योग असतो ते लोक जन्मस्थानापासून दूर जाऊन बरीच प्रगती करतात. अशी व्यक्ती संभाषण कलेत पारंगत असते. सेल्स मार्केटिंग, प्रवक्ता, प्रचारक, नेता यासारख्या क्षेत्रात, त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडतो. ते खूप यशस्वी होतात. असे लोक इतरांमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडतात. त्यांना समाजात मान, कीर्ती, संपत्ती मिळते.

सूर्य, चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावाने हस्तरेषेत अमला योग तयार होतो. सूर्य, चंद्र आणि शुक्राचा पर्वत तळहातावर उंचवटा दिसत असल्यास आणि त्यासोबत चंद्राच्या पर्वतापासून बुध पर्वतापर्यंत एक रेषा गेली असेल, तर त्यातून आमला नावाचा योग तयार होतो. या योगाच्या प्रभावाने माणूस खूप बुद्धिमान आणि धनवान बनतो. हा राजयोग असल्याने व्यक्तीला प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त होतो. कामाच्या संदर्भात, अशा लोकांना परदेशात जाण्याची संधी देखील मिळते. ज्या व्यक्तीच्या तळहातावर ही रेषा असते तिला जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. तसे, तळहातावर अशा प्रकारची रेषा असल्‍याने व्‍यक्‍ती खूप रोमँटिक बनते आणि त्‍याची लव्‍ह लाईफ देखील उत्तम असते.

ज्याच्या तळहातावर शुक्र पर्वत विकसित झाला आहे म्हणजेच उंच आहे आणि गुरु पर्वतावर फुलीचे चिन्ह तयार होते, तसेच चंद्राचा पर्वत विकसित झाला आहे आणि त्यावर स्पष्ट रेषा आहे, मरुत नावाचा शुभ योग तयार होतो. असा योग असलेल्या व्यक्तींची निर्णय क्षमता उत्तम असते. ते व्यवसायात खूप कार्यक्षम आणि यशस्वी होतात. त्यांच्याकडे संपत्ती आणि वैभवाची कमतरता नसते. या प्रकारच्या हस्तरेषा असलेले लोक कुशल वक्ते आणि ज्ञानी असतात. तसेच धर्मकार्यातही आघाडीवर असतात, ते उदार स्वभावाचे आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे असतात.

इंद्र योग वैभव प्राप्ती देणारा योग आहे. तळहातात मंगळाचा पर्वत उंचवट्यावर दिसतो आणि त्यासोबत मस्तकी रेषा आणि भाग्यरेषा पूर्ण विकसित होतात तेव्हा हा योग तळहातात तयार होतो. या योगाच्या प्रभावामुळे माणूस बलवान, धैर्यवान, हुशार आणि कुशल राजकारणी बनतो. असे लोक संरक्षण क्षेत्र, लष्कर आणि पोलिसात उच्च पदे मिळवू शकतात. त्यांना संपत्ती आणि वैभवाची कमतरता नसते. ते लहान वयातच मोठे यश आणि प्रसिद्धी मिळवतात. मंगळाच्या प्रभावामुळे वयाच्या २८ व्या वर्षी त्यांचे नशीब बलवान असते आणि उत्तरोत्तर प्रगती होताना दिसते.