PM Awas Yojana : खुशखबर! प्रधानमंत्री आवास योजना पाच वर्षांसाठी वाढवली; मोटारसायकल, फ्रीज असेल तरीही लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 03:46 PM2024-08-22T15:46:30+5:302024-08-22T16:08:54+5:30

PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती. ज्या गरीब कुटुंबाना घरे नाहीत त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे, या योजने मार्फत गरीब कुटुंबाना घरे दिली जातात. आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे नियम शिथिल केले आहेत.

आत्तापर्यंत अनेकांनी घरांसाठी अर्ज केला तेव्हा सरकारकडूम अधिकारी चौकशीसाठी यायचे तेव्हा नियमाच्या आधारे त्यांना अपात्र घोषित करण्यात यायचे. यात आता सरकारने बदल केले आहेत. त्यात बदल करून त्याला घरकुलाचा लाभ मिळू शकणार आहे.

सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही २०१५ साली सुरू झाली. या योजनेंतर्गत ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही अशा गरीब लोकांना घराचा लाभ देण्यात आला.

त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मातीच्या आणि मातीच्या घरात होता. या योजनेंतर्गत अनेकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे.

शासनाने काही दिवसापूर्वीच या योजनेच्या पात्रतेबाबत नियम शिथिल केले आहेत. आता ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपये आहे. घरी लँडलाईन फोन आहे. याशिवाय, जर त्याच्याकडे बाईक आणि फ्रीज असेल तर तेही या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

याआधी अर्जदाराचे मासिक उत्पन्न १०,००० रुपये असल्यास आणि त्याच्याकडे दुचाकी असल्यास, त्याला योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यांचे यादीतून नाव काढून टाकण्यात यायचे.

केंद्र सरकारने जुन्या नियमात बदल केले आहेत. लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी तीन हप्त्यांमध्ये १ लाख २० हजार रुपये मिळतात. यामध्ये पहिला हप्ता ७० हजार रुपये, दुसरा ४० हजार रुपये आणि तिसरा हप्ता १० हजार रुपये आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने गृहनिर्माण योजनेचे नियम बदलले आहेत. तुम्हाला बाईक, लँडलाईन फोन इत्यादी असल्यासही तुम्हाला ग्रामीण घरांचा लाभ घेता येईल.