Near Death Experience: मृत्यूनंतर काय घडतं?; मरणाच्या दारातून परतलेल्या न्यूरोसर्जनचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 02:02 PM2022-03-15T14:02:12+5:302022-03-15T14:06:05+5:30

जीवन चक्रानुसार जन्म-मृत्यू हे समीकरण कायम असतं. कुणाचीही मृत्यूपासून सुटका नाही. मृत्यूनंतर कोणतं जीवन असतं? जेव्हा शरीराचं अंत होतो तेव्हा आत्माचं काय होतं? असे विविध प्रश्न लोकांच्या मनात गेल्या शेकडो वर्षापासून अनुत्तरीतच आहेत.

मृत्यूनंतर मानवी शरीर दहन किंवा दफन केले जाते. परंतु आत्मा अमर राहतो असं ग्रंथामध्ये म्हटलं जातं. मृत्यूनंतर पुढचं आयुष्य काय? याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येतात. आतापर्यंत अनेक संशोधक यावर रिसर्च करत आहेत. परंतु त्यात तथ्य शोधणं कठीण आहे.

आता एका न्यूरो सर्जननं मृत्यूनंतरच्या जीवनाचा खुलासा केला आहे. मेंदूच्या गंभीर संसर्गानंतर न्यूरो सर्जन कोमात गेला होता. या दरम्यान, त्यांच्या चेतनेने अलौकिक जगात (Near Death Experience) जे काही पाहिले, ते त्यांनी त्यांच्या पुस्तकात वर्णन केले आहे.

द सनच्या वृत्तानुसार, ६८ वर्षीय डॉ. एबेन अलेक्झांडर हे प्रसिद्ध न्यूरो सर्जन आहेत. आपल्या २५ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी न्यूरो सर्जरी करून शेकडो लोकांना नवजीवन दिले आहे. त्यात एक वेळ अशी आली होती की, ते स्वतः मेंदूशी संबंधित आजाराने गंभीरपणे ग्रस्त झाले आणि मृत्यूच्या दारातून परत आले.

अहवालानुसार डॉ. १० नोव्हेंबर २००८ रोजी एबेन अलेक्झांडर (Dr Eben Alexander) यांना झोपेतून जाग आली तेव्हा त्याच्या शरीरात तीव्र वेदना जाणवल्या. त्याची पत्नी त्याला चहा देण्यासाठी आली असता त्यांनी शरीरात वेदना होत असल्याचं सांगितले.

आपलं शरीर दुखत असल्यानं मी आराम करेन असं त्यांनी पत्नीला सांगितले. त्यांची पत्नी चहा देऊन निघून गेली, त्यानंतर ते पुन्हा झोपले. काही तासांनंतर पत्नी परत रुममध्ये आली तेव्हा पती खाली पडलेले आणि त्याचे डोळे फिरल्याचं दिसून आले. त्यांची प्रकृती पाहून घाबरलेल्या पत्नीने तातडीने अॅम्ब्युलन्स करून तिला लिंचबर्ग जनरल हॉस्पिटलमध्ये नेले. हे तेच हॉस्पिटल होते जिथे गेली अनेक वर्षे अलेक्झांडर न्यूरोसर्जन म्हणून काम करत होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता काही वेळातच त्यांना दुर्मिळ आजार असल्याचं समोर आलं.

त्यांच्या मेंदूला E.coli meningoencephalitis या दुर्मिळ प्रकारच्या जीवाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. काही तासांतच हा विषाणू त्याच्या मेंदूवर परिणाम करू लागला. त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यांना तात्काळ व्हेंटिलेटरवर दाखल केले, जेथे ते खोल कोमात गेले.

डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले की अलेक्झांडर यांच्याकडे फक्त काही तास शिल्लक आहेत. त्यांची जगण्याची केवळ १० टक्के शक्यता आहे. ते जगले तरी आयुष्यभरासाठी अपंग बनतील आणि इतरांच्या मदतीने त्यांना कायमचे जगावे लागेल. डॉक्टरांनी त्यांना घरी नेऊन त्यांची औषधे बंद करा आणि त्यांना मरू द्या, जेणेकरून त्यांना त्रास टाळता येईल, असा सल्लाही दिला.

या डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध, अलेक्झांडर दुसऱ्या जगात भटकंतीसाठी गेले होते. (Near Death Experience). ते कोमात गेल्यानंतर पुनर्जन्म अनुभवत असल्याचे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. त्याची शरीरावरील पकड सैल झाली होती आणि आत्मा त्यातून मुक्त झाला होता. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण अंधारलेल्या तळघरात अडकलो आहोत आणि त्याला काहीही दिसत नाही. त्याला बोलायचे होते पण बोलता येत नव्हते.

यानंतर त्यांचा आत्मा एक गेट ओलांडून मोठ्या तेजस्वी वर्तुळाच्या दिशेने गेला. वर्तुळ प्रकाशाने भरले होते आणि तेथे मधुर संगीत वाजत होते. प्रकाशाचा तो गोळा मधूनच अचानक खुलला, त्यानंतर त्याला हिरव्यागार जमिनीवर नेण्यात आले. जिथे सुंदर धबधबे वाहत होते. आकाशात निळे ढग दिसत होते. तिथे शेतकरी आनंदाने नाचत होते.

तिथे फुलपाखरे उडत होती. ते एका शेतात बसले होते आणि त्याच्या शेजारी एक निळ्या डोळ्यांची बाई बसली होती. अलेक्झांडरचा दावा होता की, महिलेने टेलिपॅथिकली सांगितले की तुमच्यावर प्रेम करत आहे. आपण चुकीचे करू शकता असे काहीही नाही. काही क्षणात, ते दृश्य पूर्णपणे नाहीसे झाले आणि त्याची जागा अमर्याद रहस्यमय अंधाराने घेतली. त्या खोल अंधारात प्रकाशाचा किरण दिसत होता, जो या संपूर्ण विश्वाचा निर्माता होता.

रिपोर्टनुसार, अलेक्झांडर एक आठवडा कोमात होते. या दरम्यान त्यांना तो प्रकाश किरण दिसत राहिला. त्यादरम्यान त्यांना ५ दिव्य चेहरे दिसले. त्यातील ४ चेहरे ओळखीचे वाटत होते. तिथे एक अनोळखी चेहरा होता. अचानक त्यांचे डोळे उघडले आणि ते पुन्हा आपल्या सामान्य जीवनात परतला.

हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. काही महिन्यांच्या उपचारानंतर ते पूर्णपणे तंदुरुस्त झाले आणि तेव्हापासून ते सामान्य जीवन जगत आहे. यामुळे त्यांचे जीवन पूर्वीपेक्षा आता खूप बदलले आहे. कोमात असताना त्यांनी अद्भुत आकाशीय किरण पाहिला आहे. पूर्वी त्यांचे मृत्यूनंतरचे जीवन, आत्मा, देव यावर विश्वास नव्हता पण या घटनेने त्यांचा दृष्टीकोन बदलला. त्यांचा आता असा विश्वास आहे की या जगात प्रत्येक गोष्ट आहे जी आपल्याला जाणवते. आपण जिवंत असताना कधीही पाहू शकत नाही, म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही.