पृथ्वी आणि मंगळ यांच्यात युद्ध भडकणार, एलियन्ससोबत संपर्क होणार अन्...; बाबा वेंगा यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 09:32 PM2024-07-12T21:32:50+5:302024-07-12T21:52:38+5:30

अजूनही त्यांची अनेकं भाकितं सामान्यांना अस्वस्थ करणारी आहेत. जसे की, 2025 पासून जगाचा अंत सुरू होईल...

बाबा वेंगा अंध होत्या, पण त्यांना भविष्य दिसत होते, असे म्हटले जाते. आज त्या हायत नाहीत. मात्र, दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून त्यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत.

अजूनही त्यांची अनेकं भाकितं सामान्यांना अस्वस्थ करणारी आहेत. जसे की, २०२५ पासून जगाचा अंत सुरू होईल. एवढेच नाही तर, काही काळानंतर पृथ्वी आणि मंगळ यांच्यात युद्ध भडकणार, असेही बोलले जात आहे.

असा होणार जगाचा अंत - माध्यमांतील वृत्तांनुसार, बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे की, २०२५ मध्ये युरोपात संघर्ष निर्माण होईल. यामुळे तेथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल. यानंतर, २०२८ मध्ये, मानव उर्जा स्त्रोतासाठी शुक्रावर शोध सुरू करू शकतो. २०३३ मध्ये पोलर आइस कॅप्स वितळण्यास सुरुवात होईल, यामुळे समुद्राची पातळी वाढेल.

माध्यमांतील वृत्तांनुसार, बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे की, २०७६ मध्ये साम्यवाद संपूर्ण जगात पसरेल. २१३० मध्ये मानव एलियन्ससोबत संपर्क साधू शकतो.

यानंतर, २१७० मध्ये दुष्काळामुळे पृथ्वीचा बराचसा भाग नष्ट होईल, ३००५ मध्ये, पृथ्वी आणि मंगळ ग्रहावरील सभ्यतेत युद्ध होईल. ३७९७ मध्ये, मानवाला पृथ्वी सोडणे भाग पडेल आणि ५०७९ मध्ये जगाचा अंत होईल.

ही भकितं ठरली आहेत खरी - प्रिंसेस डायना आणि ९/११ हल्ल्यासंदर्भातील बाबा वेंगा यांची भाकीतं खरी ठरली आहेत. १९११ मध्ये जन्माला आलेल्या बाबा वेंगा यांची दृष्टी त्या १२ वर्षांच्या असतानाच गेली होती.