शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय किसान परिषदेला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 22:01 IST2017-12-12T21:30:43+5:302017-12-12T22:01:38+5:30

शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय किसान परिषदेचा समारोप कार्यक्रम शनिवार वाडा येथे करण्यात आला होता.
यावेळी एस. एम. जोशी सभागृह ते शनिवारवाडा मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीच्या सांगतेला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, तीन दिवसांच्या परिषदेत एकही राजकीय पक्ष आमच्या सोबत आलेला नाही.
आगामी काळात शेतकरी स्वतः राजकारणात प्रवेश करणार आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या हल्लाबोल आंदोलनावर सडकून टीका केली आहे.
रघुनाथ पाटील यांनी नागपूर येथील अधिवेशनातल्या हल्लाबोल आणि गदारोळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.