केस खूप गळतात- पांढरेही झाले? 'या' पद्धतीने आवळा पावडर लावा- काही दिवसांतच होतील दाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 01:03 PM2024-07-25T13:03:48+5:302024-07-25T13:10:52+5:30

केस गळण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे. काही जणांचे केस तर रोज एवढे जास्त गळतात की ते पाहून लवकरच टक्कल पडेल की काय अशी भीती वाटते.

प्रदुषण, ऊन यांचाही केसांवर परिणाम होतोच. शिवाय त्यांना पुरेसं पोषण देण्यातही आपण कमी पडतो. त्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते.

केसांसंबंधी या तक्रारी दूर करायच्या असतील तर एका खास पद्धतीने आवळ्याचा हेअरमास्क केसांना लावून पाहा. काही दिवसांतच केस गळणं कमी होईल. शिवाय केस अकाली पांढरे होणंही कमी हाेईल.

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ चमचे आवळा पावडर आणि २ चमचे पाणी घ्या.

यानंतर या मिश्रणामध्ये २ चमचे दही टाका. दह्यामुळे केसांची मुळा पक्की होण्यास मदत होते.

आता त्यामध्ये एक ते दिड चमचा खोबरेल तेल टाका.

या मिश्रणात १ ते दिड चमचा मधसुद्धा टाका. मधामुळे केसांवर चमक येते आणि केसांना पोषण मिळते.

हे सगळे पदार्थ आता व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. त्यानंतर केसांचा गुंता काढू टाका आणि केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर हा हेअरमास्क लावा. अर्ध्या ते पाऊण तासांनी केस धुवून टाका.

हा उपाय आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल.