उभं राहिल्यावर, चालताना टाच खूप ठणकते? डॉक्टर सांगतात त्यामागची कारणं आणि उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2025 09:30 IST2025-04-12T09:25:30+5:302025-04-12T09:30:02+5:30

बहुतांश महिलांना टाच दुखण्याचा त्रास होतो. सकाळी झोपेतून उठल्यावर जेव्हा उभं राहातो तेव्हा तर टाचेत खूप वेदना होतात. शिवाय चालतानाही टाच नेहमीच ठणकते..
हा त्रास कधी कधी तर एवढा वाढतो की चालणंही असह्य होऊन जातं. हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच.. पण त्याआधी हे काही उपायही करून पाहा.. कदाचित तुमची टाचदुखी बरी होऊ शकते..
सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही वापरता ती चप्पल किंवा बूट चांगल्या दर्जाचा, तुमच्या पायाच्या अचूक मापाचा आहे की नाही हे एकदा तपासून पाहा. उंचा टाचेच्या चपला जास्त वेळ वापरल्यानेही टाचदुखी होऊ शकते.
ज्या व्यक्तींचं वजन जास्त असतं त्यांनाही टाचदुखीचा त्रास होतो. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवा.
ज्या महिलांना जास्त वेळ उभं राहावं लागतं त्यांनाही टाचदुखीचा त्रास होतो. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा खाली बसून काम करावे.
ज्या लोकांना मधुमेह असतो त्यांच्यामध्ये पायातील रक्तप्रवाह व नसा खराब झाल्यानेही टाचदुखीचा त्रास होऊ शकतो.
टाचदुखी कमी करण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवा. नियमितपणे व्यायाम करा. तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवावा असा सल्ला डाॅ. अनिल धुळे देतात.