निवडणुकीनंतर उमेदवारांनी कुटुंबासोबत घालवला निवांत वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 00:34 IST2019-05-02T00:32:30+5:302019-05-02T00:34:21+5:30

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जवळपास महिनाभरापासून पक्षाच्या बैठका, रॅली आणि प्रचारसभांमध्ये व्यस्त असलेले उमेदवार आणि विविध पक्षनेत्यांनी सोमवारी मतदान आटोपल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. निवडणूक आटोपताच खा. राजन विचारे आणि आनंद परांजपे कुटुंबात रमले. खा. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्याच्या मॉलमध्ये जाऊन शॉपिंग केली. तर आ. जितेंद्र आव्हाड यांनीही कुटुंबासोबत, तसेच त्यांच्या लाडक्या पपीसोबत निवांत वेळ घालवला.