शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

पवना धरणात २२ टक्के पाणीसाठा, पाऊस लवकर न आल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये 'पाणी-बाणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 14:20 IST

पावसाने हुलकावणी दिल्यास शहरात पाणी कपात करावी लागणार आहे...

पिंपरी : मावळ तालुक्यातील पवना धरणात अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजेच ४० दिवस पुरणार आहे. मात्र, पाऊस लवकर न आल्यास पिंपरी चिंचवड शहरातील पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. पावसाने हुलकावणी दिल्यास शहरात पाणी कपात करावी लागणार आहे.

महापालिका पवना धरणातून पाणी उचलून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करते. पवना नदीवरील रावेत बंधारा येथून पाणी उचलून सध्या शहराला दररोज ५१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. तीव्र उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाण्याचा साठा वेगात कमी होत आहे. कडक उन्हामुळे पवना धरणात सध्या २२ टक्के इतका पाणी साठा उरला आहे. हा साठा जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेल इतका आहे, असे असतानाच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. येत्या काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी न लावता तो लांबल्यास हा पाणी साठा कमी पडणार आहे. तर यंदा सुरुवातीलाच पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने भीती व्यक्त केली जात आहे. ७ जूनला पाऊस राज्यामध्ये दाखल होत असतो. मात्र यावर्षी ८ जूनला पाऊस केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढे प्रवासासाठी त्याला अनुकूल परिस्थिती नसल्यास पाऊस आणखी लांबण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका, मावळातील काही नगरपालिका व एमआयडीसीवर पाणी कपातीची वेळ येऊ शकते.

पवना धरणात सध्या केवळ २२ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेल इतके आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. पावसाने हुलकावणी दिल्यास जुलै महिन्यामध्ये धरणातील पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

- समीर मोरे, उपअभियंता, पवना धरण

टॅग्स :Damधरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड