शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पिंपरी शहरास २३५ एमएलडी पाणी उपलब्ध होणार; तूर्त दिवसाआडच पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:52 IST

दिवसाआड पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू

ठळक मुद्देपाणी उचलणे आणि शुद्धीकरणाची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठापुणे महापालिकेचे आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरू रावेत येथील पंपगृहातील १९ पंप चोवीस तास सुरू

पिंपरी : महापालिका क्षेत्रातील दिवसाआड पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असून, पवना नदीतील रावेत येथील केंद्राची शंभर एमएलडी क्षमता वाढविणे, इंद्रायणी नदीतून शंभर एमएलडी आणि वाघोली योजनेतून ३५ असे एकूण २३५ एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी उचलणे आणि शुद्धीकरणाची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहील. त्याला पावसाळादेखील उजाडेल किंवा त्यापुढेदेखील कालावधी लागेल. त्यानंतरच दररोज पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरास पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेला पवना धरणातून प्रतिदिन केवळ ४२० एमएलडी पाणीउपसा करण्याची परवानगी आहे. महापालिका पाचशे एमएलडी पाणी उचलत आहे. त्यापुढील पाण्यासाठी महापालिका दंड भरावा लागत आहे. अधिक पाणी उपलब्ध असल्यावर दंड भरून महापालिकेला जादा पाणी दिले जाते. पवना नदीतून रावेत बंधारा येथील पालिकेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. मात्र, पाणी उचलण्याची क्षमता कमी आहे. ही क्षमता वाढविण्याच्या विषयाला मंजुरी दिली आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यशहरात पाणी कपात केलेली नाही. दिवसाआड पुरसे पाणी दिले जात आहे. रावेत येथील पंपगृहातील १९ पंप चोवीस तास सुरू आहेत. त्यासाठी पंपिंगची क्षमता वाढविण्यात येणार आहे. जुने पंप काढून मोठ्या क्षमतेचे नवीन पंप टाकले जाणार आहेत. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. तसेच सेक्टर तेवीसमधील जलशुद्धीकरण केंद्रात सध्या पाचशे एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. या क्षमतेत ५८० एमएलडीपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. विजेचा भारदेखील वाढवून घेतला जाणार आहे. शंभर एमएलडी अधिकचे पाणी निर्माण होऊ शकते. त्यानंतर दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

इंद्रायणीचाही पर्यायपुणे महापालिकेचे आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह महापालिकेस हस्तांतरित होणार आहे. त्यातून ३५ एमएलडी पाणी उपलब्ध होईल. त्यानंतरसुद्धा दररोज पाणीपुरवठा करता येऊ शकेल. तसेच देहू बंधाऱ्यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून पाणीपुरवठा करता येईल. देहूलाही पाणी प्रक्रिया करण्यासाठी मदत करणार असल्याचेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीshravan hardikarश्रावण हर्डिकर