शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

स्मार्ट सिटीची स्वच्छतेत पिछाडी, अभियानाचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:55 IST

नागरिकांचा अल्प प्रतिसाद; महापालिकेच्या घंटागाडीची अनियमित हजेरी

दिघी : शासनाच्या नागरी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण २०१८ हे अभियान पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राबविले. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. श्रीमंत महापालिका असा लौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छता उपक्रमात १३ वे स्थान मिळविले आहे. स्वच्छता अभियानात स्मार्ट सिटी पिछाडीवर गेली आहे.स्वच्छता अभियानांतर्गत ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिकेकडून घरोघरी प्लॅस्टिक बादल्या वाटप करण्यात आल्या. ओला व सुका कचरा घरातून वेगळा करून तो बादल्यांमध्ये जमा करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या. घंटागाडी येताच नागरिकांनी सोसायटीजवळ जमा केलेला ओला व सुका कचरा घंटागाडीवाल्यांकडे द्यायचा, अशी कचरा जमा करण्याची पद्धती अवलंबली होती.परिसरातील बसथांबे, सोसायट्या, उपनगरांतील नागरी वस्त्यांमध्ये पालिकेने कुंड्या ठेवल्या आहेत. ओला-सुका कचरा कुंड्या मिश्र स्वरूपाच्या कचऱ्याने ओसांडून वाहत असल्याचे सर्वत्र आढळून येत आहे. शिवाय पालिकेकडून नागरिकांना वाटलेल्या ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठीच्या प्लॅस्टिक कचरा कुंडीचा वापरच होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.पाणीपुरीवाले, चायनीज सेंटर, भाजी विक्रेते, मंगल कार्यालये, पानटपऱ्या येथून निर्माण होणारा कचरा एकत्रित केला जात आहे.उष्टे अन्न, शिळे अन्न, कागदी, थर्माकॉल, प्लॅस्टिक पत्रावळी, पेपर डिश, सडक्या पालेभाज्या, फळे, प्लॅस्टिक बाटल्या, आईस्क्रीमचे रिकामे डबे, कागद, काच अशा कचºयाचा मोकळ्या मैदानात ठिकठिकाणी ढीग लागल्याचे चित्र दिसून येते.घरोघरचा जमा होणारा कचरा घेण्यासाठी येणारी महापालिका सफाई कामगारांची घंटागाडी नियमित येत नाही. घंटागाडीत नेहमीच दोन-तीन कर्मचारी असतात. नागरिकांनी टाकलेला मिश्र कचरा वेगळा करीत असतात. घरातील कचरा जमा करताना नागरिक ओला व सुका कचरा वेगळा न करता सर्रासपणे एकाच कचराकुंडीत जमा करीत आहेत. वास्तविक पालिकेने ओला कचरा जमा करण्यासाठी हिरवी व सुका कचरा जमा करण्यासाठी पांढरी प्लॅस्टिक बादली दिली आहे.कचºयाचे वर्गीकरण करण्याच्या उद्देशाने रहिवाशांना प्लॅस्टिक कचराकुंडीचे वाटप करण्यात आले होते. या कुंडीचा वापर करून नागरिकांचा स्वच्छता अभियानांतर्गत सहभाग वाढावा, असा महापालिकेचा उद्देश होता. मात्र नागरिकांमध्ये योग्य प्रकारे जनजागृती झाली नसल्याने प्रतिसाद मिळत नाही. परिणामी स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.स्वच्छतागृहांचा अभावपरिसरात नवीन झालेली स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ होत नसल्याने दुर्गंधीची ठिकाणे बनली आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहांचा वापर होताना दिसत नाही. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई व्हावी, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. परिसरातील उपनगरात मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांतून निघणारा कचरा मोठ्या प्रमाणात आहे.यामध्ये काही सोसायट्यांनी कचºयाची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा विकसित केली आहे. कचरा विल्हेवाटीची यंत्रणा राबविण्यासाठी बोटावर मोजण्याइतपत सोसायट्या पुढे आल्या. सोसायट्यांचा प्रतिसाद अल्प प्रमाणात मिळाल्याने या वर्षीच्या महापालिकेच्या स्वच्छता गुणांकनामध्ये घसरण झाल्याबद्दल बोलले जात आहे.ओला आणि सुका कचरा यातील फरकशिळे अन्नपदार्थ, तसेच पालेभाज्या याचा समावेश ओला कचºयामध्ये होतो; तर कागद, पुठ्ठा, थर्माकोल, प्लॅस्टिक पिशव्या याचा सुका कचरा यामध्ये समावेश होतो. मात्र कोणीही असा कचरा विलगीकरण करण्याची तसदी घेत नाही.घराघरांतून निर्माण होणारा कचरा वर्गीकरण होऊन बाहेर पडत नसल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांना कचरा जमा करताना, कचºयाचे विलगीकरण करण्यात अधिक वेळ द्यावा लागतो आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेत अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड