शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
2
डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
3
"पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, मांजर बनतील; जे लोकशाही..."
4
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
5
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
6
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
7
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
8
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
9
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
10
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
12
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
13
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
14
ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?
15
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
16
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
17
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
18
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
19
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
20
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप

Indrayani Polluted: बापरे केवढं हे प्रदूषण! इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली, चक्क बर्फवृष्टी झाल्याचा भास

By विश्वास मोरे | Updated: May 29, 2024 11:16 IST

लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीपात्र दूषित

पिंपरी: अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या देहू- आळंदीकरांची जीवनदायी असणाऱ्या इंद्रायणीनदीचे  पात्र फेसाळली आहे.  त्यामुळे बर्फवृष्टी झाल्याचा भास होता होत आहे. नदीप्रदूषणाकडे जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि पीएमआरडीचे दुर्लक्ष होते.

पुणे जिल्हयातील खेड आणि मावळ  तालुक्यातून इंद्रायणी नदी वाहते. लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीचे पात्र दूषित झाला आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण, नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे राज्य सरकारचे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होते.

सहा महिने झाले तरी...

गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मात्र नदी फेसाळण्याचं कारण अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. डिटर्जंटमुळे नदी फेसाळत आहे,  असा अजब अंदाज प्रदूषण नियंत्रण महामंडळ लावत आहे. 

चाकण परिसरातील सांडपाणी थेटपणे!

पीएमआरडीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण झालं आहे. तसेच चाकण परिसरातील निघोजे, मोई आणि चिंबळी या भागातील सांडपाणी थेटपणे नदीत सोडले जात आहे. त्याकडे पीएमआरडीएचे लक्ष नाही.

कालपासून पुन्हा नदी फेसाळली

इंद्रायणी नदीवर देहू आणि आळंदी ही प्रमुख तीर्थक्षेत्र येतात. आळंदी पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. कालपासून नदी फेसाळलेली आहे. बुधवारी सकाळी ही नदीची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले. सर्वत्र बर्फवृष्टी झाल्याचा भास होतो होता. 

सामाजिक आणि पर्यावरणवादी संघटनांनी केल्या तक्रारी!

आळंदीतील नदी प्रदूषणाबाबत जलदिंडी प्रतिष्ठान, इंद्रायणी सेवा संघ आदी संस्थांच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केलेल्या आहेत. नदी प्रदूषण रोखावे, तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीindrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणriverनदी