शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Indrayani Polluted: बापरे केवढं हे प्रदूषण! इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली, चक्क बर्फवृष्टी झाल्याचा भास

By विश्वास मोरे | Published: May 29, 2024 11:15 AM

लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीपात्र दूषित

पिंपरी: अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या देहू- आळंदीकरांची जीवनदायी असणाऱ्या इंद्रायणीनदीचे  पात्र फेसाळली आहे.  त्यामुळे बर्फवृष्टी झाल्याचा भास होता होत आहे. नदीप्रदूषणाकडे जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि पीएमआरडीचे दुर्लक्ष होते.

पुणे जिल्हयातील खेड आणि मावळ  तालुक्यातून इंद्रायणी नदी वाहते. लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीचे पात्र दूषित झाला आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण, नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे राज्य सरकारचे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होते.

सहा महिने झाले तरी...

गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मात्र नदी फेसाळण्याचं कारण अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. डिटर्जंटमुळे नदी फेसाळत आहे,  असा अजब अंदाज प्रदूषण नियंत्रण महामंडळ लावत आहे. 

चाकण परिसरातील सांडपाणी थेटपणे!

पीएमआरडीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण झालं आहे. तसेच चाकण परिसरातील निघोजे, मोई आणि चिंबळी या भागातील सांडपाणी थेटपणे नदीत सोडले जात आहे. त्याकडे पीएमआरडीएचे लक्ष नाही.

कालपासून पुन्हा नदी फेसाळली

इंद्रायणी नदीवर देहू आणि आळंदी ही प्रमुख तीर्थक्षेत्र येतात. आळंदी पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. कालपासून नदी फेसाळलेली आहे. बुधवारी सकाळी ही नदीची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले. सर्वत्र बर्फवृष्टी झाल्याचा भास होतो होता. 

सामाजिक आणि पर्यावरणवादी संघटनांनी केल्या तक्रारी!

आळंदीतील नदी प्रदूषणाबाबत जलदिंडी प्रतिष्ठान, इंद्रायणी सेवा संघ आदी संस्थांच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केलेल्या आहेत. नदी प्रदूषण रोखावे, तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीindrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणriverनदी