शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

उमेदवारी अर्जासाठी अमावास्याचे ग्रहण?

By admin | Published: January 28, 2017 12:27 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी अमावास्या असल्यामुळे

नेहरुनगर : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी अमावास्या असल्यामुळे शहरातील ११ निवडणूक कार्यालयात एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अमावास्या असल्याने इच्छुकांनी अर्ज भरला नसल्याची जोरदार चर्चा होती. शिवाय राजकीय पक्षांकडून उमेदवारी देण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले असले, तरी उमेदवारीबाबत दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीबाबतचा निर्णयही अद्याप झालेला नाही. यासह इतर पक्षांकडूनही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे देखील अर्ज दाखल झाले नाहीत. महापालिकेच्या १२८ जागांसाठी शहरातील ३२ प्रभागांतून मोठ्या प्रमाणावर इच्छुक असतानाही एकही अर्ज दाखल झाला नाही. अनेकजण अर्ज दाखल करताना मुहूर्त पाहतात. अर्ज भरण्यापासून ते प्रचारासाठी घराबाहेर पडण्यापर्यंत मुहूर्त पाहिले जात आहेत. उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. शिवाय अमावस्येचा मुहुर्त त्यामुळे एकही अर्ज दाखल झाला नाही.(वार्ताहर)