शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

ऐन पावसाळ्यात खोदाईला मुहूर्त

By admin | Published: June 30, 2017 3:43 AM

ताथवडेतील मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची चिरफाड करून कासवगतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : ताथवडेतील मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची चिरफाड करून कासवगतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कामामुळे ताथवडेकरांची त्रेधातिरपीट सुरू आहे. त्यांची नित्याची वाट महापालिकेने अतिशय बिकट बनवून या रस्त्यावर अक्षरश: राडा घातला आहे. संथगतीने सुरू असलेले काम वाटसरूंच्या जीवावर बेतत आहे. या रस्त्यावर जेएननर्मच्या माध्यमातून महापलिका पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या सहाशे व्यासाची मोठी पाईपलाईन बसवीत आहे़ मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हे काम अतिशय संथगतीने सुरू असून नुकताच झालेल्या पावसामुळे या कामाचा फज्जा झाल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे़ सुमारे दीड कि़मी़चा हा रस्ता पार करण्यासाठी रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भर रस्त्यात खोदलेले मोठाले खड्डे, सर्वत्र चिखल-गाळ, राडारोड्याने रस्ता माखून दाणादाण उडाली आहे़ त्यातच तो चिखल मातीने निसरडा होऊन धोकादायक बनला आहे. सातत्याने होणारी वाहतूककोंडी, अपघाते आणि वाहने चिखलात रुतण्याचे प्रकार यामुळे ग्रामस्थ, रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिकटावस्था झालेल्या या रस्त्यावर गेल्या आठवड्याभरात सुमारे ५० दुचाकी घसरून अनेक जण गंभीर जखमी झाले. मागील काही दिवसात तर २० हून अधिक अवजड वाहने चिखलात रुतले आहेत. या अवजड वाहने मधेच चिखलात रुतल्याने वाहतुककोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी सर्वांचीच मोठी पंचाईत होते मग स्वत:च्याच घरी अथवा इच्छितस्थळी जाण्यासाठी मोठा पाच कि़मी़चा वळसा मारण्याची नामुष्की येथील रहिवाशांवर ओढावत असल्याने सर्वांचाच तिळपापड होत आहे. अखेर मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी कामगारांना याबाबत जाब विचारीत काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतल्याने दोन दिवसांपासून काम बंद आहे. मात्र, या रस्त्यावरून जाण्याचे म्हणजेच अग्निदिव्यातून जाण्याचा धोका कायम आहे.