शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

वडगाव मावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांची झाली दुरावस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:52 IST

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे.

ठळक मुद्दे वडगाव शहराची लोकसंख्या सुमारे ३० हजारइंद्रायणी नदीवरून जांभूळ येथील बंधारा, कातवी व सांगवी येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा

विजय सुराणा वडगाव मावळ : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. पाणी असूनही नियोजनाअभावी पाणीटंचाई झाली आहे. वडगाव शहराची लोकसंख्या सुमारे ३० हजार आहे. सुदैवाने शहरात पाण्याची उपलब्धता योग्य आहे. परंतु नियोजन नसल्याने काही भागात कमी प्रमाणात पाणी येते. काही ठिकाणी नळाला थेंब थेंब येते, तर काही भागात धो धो पाणी येते. आतापर्यंत शहरात दुष्काळाची झळ न बसल्याने व पाण्याची किंमत न समजल्याने शहरातील काही भागात नळावाटे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वडगावमधील काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने महिलांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.वडगाव शहरात पूर्वीपासून ग्रामपंचायत होती. ती बरखास्त होऊन नगरपंचायतमध्ये समावेश झाला आहे. नळपाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांना अर्धा इंच पाईपलाईन टाकून नळजोड द्यायचा नियम आहे. परंतु , ग्रामपंचायत असताना अनेकांनी हा नियम धाब्यावर बसवून एक इंची पाईपलाईन टाकून नळावाटे पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. त्यामुळे त्यांना धो धो पाणी मिळते, तर काहींना थेंब थेब पाणी मिळत आहे.इंद्रायणी नदीवरून जांभूळ येथील बंधारा, कातवी व सांगवी येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून पूर्वी जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर बंधारा बांधला. त्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. नदीतून येणारे हे पाणी शहरातील शिंदे टेकडी, डेक्कन हिल, न्यू इंग्लिश स्कूल, संस्कृतीनगर, म्हाळसकर वस्ती, हरणेश्वर टेकडी, मिलिंदनगर, कातवी व टाटा हौसिंग येथील आठ पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. ..........पाण्यासाठी भटकंती

* शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून पूर्वी जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर बंधारा बांधला. त्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. नदीतून येणारे हे पाणी शहरातील शिंदे टेकडी, डेक्कन हिल, न्यू इंग्लिश स्कूल, संस्कृतीनगर, म्हाळसकर वस्ती, हरणेश्वर टेकडी, मिलिंदनगर, कातवी व टाटा हौसिंग येथील आठ पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. ४१० लाख लिटर एवढी साठवण क्षमता या टाक्यांची आहे. तसेच केशवनगर भागासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. वडगाव शहराची लोकसंख्या ३० हजार आहे. त्याप्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु, काही ठिकाणी कमी प्रमाणात पाणी येते. तर काही ठिकाणी जादा प्रमाणात पाणी येते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे......* लोकसंख्येच्या मानाने शहराला मुबलक पाणी असतानाही शहरातील काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, यासाठी नगरसेवकांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. * वडगाव शहराला पाणीपुरवठा होत असलेला जांभूळ येथील बंधारा पूर्णपणे निकामी झाला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अन्यथा हा कोसळल्यास शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो.

‘‘केशवनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम महिनाभरात पूर्ण होईल. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येणार असून, जांभूळ येथील बंधाºयाचे काम लवकरच करण्यात येईल.’’  मयूर ढोरे, नगराध्यक्ष

 

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळWaterपाणी