शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

मावळ तालुक्यात भातलागवडी जोमात

By admin | Published: July 02, 2017 2:26 AM

मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या पावसाचा जोर असल्याने लावणीच्या कामांना विलंब होऊ नये, यासाठी येथील शेतकरी प्लॅस्टिक कागद, पोते, इरले-घोंगड्याचा वापर करून भात लावणीची कामे करताना दिसत आहेत.मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात हे मुख्य पीक शेतकरी घेतात. या भागातील शेतकरी दरवर्षी नदीच्या पाण्यावर रोपवाटिका तयार करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने रोपे लागवडीसाठी शेतात पाणी  आल्याने लागवड सुरू करण्यात आली.वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मुळशी तालुक्यात भातलागवडीसाठी मजूरच मिळत नाहीत. काही गावांमध्ये एकमेकांमध्ये अदलाबदली करून भातलागवड सुरू केली आहे. काही परराज्यांतील बांधकाम मजुरांना शेतीकामासाठी न्यावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.अधिक उत्पन्न वाढीसाठी व मशागतीसाठी चारसूत्री पद्धत अत्यंत योग्य असल्याने, रोग व किड्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते. त्याचबरोबर सर्व रोपांना योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळतो. हवा खेळती राहत असल्याने उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे. शेतकरी सध्या पारंपरिक पद्धत सोडून चारसूत्री भातलागवडीकडे वळलेला दिसत आहे.वारंवार कृषी अधिकाऱ्यांकडून सल्ला घेतला जात आहे. तसेच शेतकरी एकमेकांना मदत करत असल्याने भात रोपांची लागवड केली जात आहे. तसेच आधुनिक चारसुत्री पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे.संततधार पावसाने भातरोपे जोमातवडगाव मावळ : या नक्षत्रात निसर्गाच्या अवकृपेमुळे पावसाने दडी मारल्याने भातपिकाच्या दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यावर ओढवले असते. ठिकठिकाणी भाताची रोपे उगवली होती. ती पावसाअभावी पिवळी पडत चालली होती. तरी, बळीराजाला वरुणराजने चांगली साथ दिली; त्यामुळे भातरोपे जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भातरोपे मोठ्या डौलात वाढत आहेत.