शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

पोलीस आयुक्तांच्या सततच्या बदल्यांमुळे शहर पोलीस दलच अडचणीत; प्रशासन बुचकळ्यात पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 16:37 IST

राज्यातील सत्ता बदलली की, शहरातील पोलीस आयुक्त बदलतात, असा संदेश जणू अंकुश शिंदे यांच्या बदलीतून दिला गेला

नारायण बडगुजर

पिंपरी : सरकारी काम अन् सहा महिने थांब, ही म्हण बहुतांश प्रकरणांमध्ये तंतोतंत लागू होते. असाच प्रकार राज्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारातून समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला २०२२ या एकाच वर्षात तीन पोलीस आयुक्त लाभले. पोलीस आयुक्तांच्या सततच्या बदल्यांमुळे शहर पोलीस दल अद्याप स्थिरस्थावर झालेले नाही. याबाबत काही सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी राज्यपाल तसेच शासनाकडे अर्ज दिले. यातील काही अर्ज पोलीस आयुक्तालयाला आता प्राप्त झाले आहेत. या अर्जांचे करायचे काय? असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. आर. के. पद्मनाभन यांनी शहराचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा कारभार सुरू केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमवीर प्रशासकीय कारणास्तव पद्मनाभन यांची मूदतपूर्व बदली झाली. त्यानंतर संदीप बिष्णोई यांनी पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांचीही मूदतपूर्व बदली झाली. त्यानंतरचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची सव्वा वर्षात तर अंकुश शिंदे यांची आठ महिन्यांतच बदली झाली. सध्या विनय कुमार चौबे हे पोलीस आयुक्त शहर पोलीस दलाचे कामकाज सांभाळत आहेत.

पोलीस आयुक्तांच्या मुदतपूर्व बदली होत असल्याने शहरातून नाराजी व्यक्त होत आहे. आयुक्तालयातील उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामुग्री, गुन्हेगारी आणि तपासावर येणाऱ्या मर्यादा याला समजून घेण्यातच पोलीस आयुक्तांचा बराचसा कालावधी जातो. त्यानंतर त्यांच्याकडून विविध उपाययोजना आणि धोरण आखणी केली जाते. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वीच त्यांची बदली होते. तत्कालीन आयुक्तांनी शहरातील अवैध धंद्यांवर ‘अंकुश’ ठेवला. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला.  

शासनाकडे अर्जाव्दारे तक्रार

पोलीस आयुक्तांच्या होणाऱ्या बदल्यांबाबत काही नागरिकांनी अर्ज केले. मात्र, शासनाने तत्काळ दखल घेतली नसल्याने हे अर्ज सरकारी टेबलवर फिरत आहेत. यातील काही अर्ज शासनाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे पाठवले आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्या मुदतपूर्व बदलीची चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी पुर्नपदस्थापना करण्यात यावी, अशी मागणी या अर्जांमधून केली आहे. दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असेही अर्जांमध्ये नमूद आहे.    

चौकशी कोण करणार?

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी संबंधित अर्ज असल्याचे सांगून राज्यपाल तसेच शासनाकडून संबंधित अर्ज आयुक्तालयाकडे पाठविण्यात येत आहेत. मात्र, या अर्जांचे करायचे काय? याची चौकशी कशी करायची, चौकशी करण्यासाठी अर्ज कोणाकडे द्यावेत, असे विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राजकीय हस्तक्षेप वाढला

गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची घडी बसवणे आवश्यक आहे. त्यासाठी आतापर्यंतच्या पोलीस आयुक्तांनी यथायोग्य प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही वर्षांत पोलीस आयुक्तालयाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेत प वाढला आहे. या राजकीय ‘दादा’गिरीमुळे अधिकाऱ्यांवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे अशी ‘दादा’गिरी थांबणे आवश्यक आहे.

अंकुश शिंदे यांचा दोष काय?

‘चुकीला माफी नाही’ असे म्हणत तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वेळोवेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. त्यामुळे अनेकांनी त्यांचा धसका घेतला होता. यातून शहर पोलीस दलाला शिस्त लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, कारवाई झालेले काही पोलीस अधिकारी व कर्मचारी राजकीय पदाधिकाऱ्यांकडे गेले. यातून शहर पोलीस दलात राजकीय पदाधिकाऱ्यांची ‘दादा’गिरी वाढली. दरम्यान, चिंचवड येथील शाईफेक प्रकरणानंतर शहरात आंदोलन, माेर्चे झाले. तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर अंकुश शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

शहर पोलीस दलाचा सोयीनुसार वापर?

राज्यातील सत्ता बदलली की, शहरातील पोलीस आयुक्त बदलतात, असा संदेश जणू अंकुश शिंदे यांच्या बदलीतून दिला गेला. यातून शहर पोलीस दलाचा वापर राजकीय सोयीनुसार होत असल्याची चर्चा रंगली. पोलीस शिपायाच्या बदलीसाठीही राजकीय पदाधिकारी ‘पाॅवर’ वापरत असल्याचे वेळोवेळी समोर आले. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाची प्रशासकीय घडी बसणार कशी, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित होत आहे.

टॅग्स :Puneपुणेcommissionerआयुक्तPoliceपोलिसSocialसामाजिकPoliticsराजकारण