महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पिंपरी-चिंचवडमध्ये 'चिखल फेको' आंदोलन

By विश्वास मोरे | Published: June 21, 2024 04:10 PM2024-06-21T16:10:06+5:302024-06-21T16:11:21+5:30

अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली. घोषणाबाजी केली....

Congress aggressive against the grand coalition government, 'mud throw' movement in Pimpri-Chinchwad | महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पिंपरी-चिंचवडमध्ये 'चिखल फेको' आंदोलन

महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पिंपरी-चिंचवडमध्ये 'चिखल फेको' आंदोलन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे युती सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक चिखल फेक आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली. घोषणाबाजी केली. 

आंदोलनात कविचंद भाट, अमर नाणेकर, विश्वनाथ जगताप, माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, शामला सोनवणे, बाबू नायर, शहाबुद्दीन शेख,  हरीश डोळस, बाबा बनसोडे, जुबेर खान, भाऊसाहेब मुगुटमल, सचिन कोंढरे, मयूर जयस्वाल, गौरव चौधरी, वसंत वारे, सोमनाथ शेळके, वाहब शेख, ॲड. अशोक धायगुडे, ॲड. अनिकेत रसाळ, उमेश बनसोडे आदी उपस्थित होते.

डॉ. कैलास कदम म्हणाले, राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, युवक, महिला, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. पुरोगामी महाराष्ट्रात भाजप सरकार समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे.

राज्यातील सर्वसामान्य नागरिक या सरकारवर चिखल फेक करून सरकारचा तीव्र निषेध करीत आहे.  मागील दहा वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती बंद केली आहे. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ज्या परीक्षा घेतल्या त्यात पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे तरी त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही. सरकार किमान हमीभाव देत नाही.'

महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बियाणांचा काळाबाजार, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. तरुणींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे, कमिशन घेणे एवढेच काम करत आहे. राज्यातील महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार घरी पाठवणार आहेत असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.

Web Title: Congress aggressive against the grand coalition government, 'mud throw' movement in Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.