शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Corona virus : पिंपरी शहरातील रुग्णालयांचे म्हणजे 'नाव मोठे अन् लक्षण खोटे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 12:44 IST

जेवढे पैसे घेता तेवढी तरी सुविधा द्या, रुग्णांच्या नातेवाईकांची माफक अपेक्षा

ठळक मुद्देकोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची भावना

युगंधर ताजणे

पिंपरी :  कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने  ‘त्या’ रुग्णालयातील जनरल वॉर्डात भरती झालो. डिपॉझिट म्हणून 30 हजार रुपये देखील घेतले गेले. पुढे महिनाभर रुग्णालयात उपचार घेत होतो. मात्र या काळात त्यांच्याकडून मिळालेली सेवा अतिशय मानसिक त्रास देणारी होती. प्यायला पाणी हवे असल्यास देखील तीन ते चार वेळा नर्सेसला विनवणी करावी लागत होती. जनरल वॉर्डमध्ये तर डॉक्टर फिरकत सुध्दा नव्हते. उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांचे महिनाभर नाव ऐकले परंतु रुग्णालयातून डिस्जार्ज मिळेपर्यंत ते काही दिसले नाहीत. यासंबंधी विचारणा केली असता ते सुट्टीवर आहेत, एका महत्वाच्या मिटींगमध्ये आहेत असे सांगितले जायचे. साडेतीन लाख रुपयांचे बील भरुन रुग्णालयातून बाहेर पडलो. किमान जेवढे पैसे घेता त्या प्रमाणात उपचार देखील करा. अशी व्यथा होनाजी अहिनवे (रुग्णाचे नाव बदलले आहे) यांनी व्यक्त केली आहे.  

होनाजी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांना सांगण्यात आल्यानंतर ते तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार देखील सुरु करण्यात आले. काही दिवसानंतर त्यांना तेथील ढिसाळ नियोजन व कार्यशैलीचा प्रत्यय येऊ लागला. उपचारापूर्वी पैशांची मागणी, ती पूर्ण केल्यानंतर उपचार केव्हा केले, कसे केले याची रुग्णाला देखील माहिती नसते अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या बाजुच्या कॉटवर असणा-या एका रुग्णाला पाणी हवे असताना त्यासाठी त्याला अनेक तास प्रतिक्षा करावी लागली. एकदा पाणी दिल्यानंतर दोन ते तीन दिवस कुणी पाहत नव्हते. नर्सेस सोडल्यास कुणीही रुग्णाकडे फिरकत देखील नाही.  जे बेड होते त्यांचा दर्जा अतिशय नित्कृष्ठ होता. दहा ते बारा दिवस आयसीयुमध्ये असताना तेवढ्या कालावधीत कुठला डॉक्टर  तिथे आल्याचे आठवत नाही.  

‘त्या’ रुग्णालयाचा अनुभव अतिशय क्लेशकारक होता. बाथरुम मध्ये साबण नाही. सँनिटायझरची व्यवस्था नाही. अशी परिस्थिती होती. नर्सेस औषधे देण्यासाठी, आॅक्सिजन देण्यासाठी यायच्या. इतर डॉक्टर बाहेरुन रुग्णांशी संवाद साधत होते. विशेष म्हणजे घरातील इतर नातेवाईक आकुर्डीतील आणि बालेवाडीतील एका पालिका प्रशासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या दवाखान्यात दाखल होते. मात्र त्यांना तिथे सर्वसोयीसुविधा चांगल्या मिळाल्या. रुग्णांची काळजी घेतली जात होती. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. 

 पॅकेज घ्या, घरी ‘क्वारंटाईंन’ व्हा आम्ही उपचार करु कोरोनाचा वाढणारा संसर्ग यामुळे आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये पुरेशा संख्येने बेड उपलब्ध नाहीत. अशावेळी रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी काही खासगी रुग्णालयांनी नवा  ‘फंडा’ शोधून काढला आहे. यात रुग्णाने आपली चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच क्वॉराईनटाईन होण्याचा पर्याय रुग्णांसमोर ठेवल आहे. यासाठी दहा ते वीस हजारांपर्यंतचे पँकेज रुग्णालय देणार असून यामध्ये रुग्णाला टेलिमेडिसनच्या साह्याने समुपदेशन, थर्मामीटर, हायड्रोक्लोरोक्वीनच्या गोळया, आॅक्सीमीटर, मास्क, ग्लोव्हज आदी सुविधा देण्यात येणार आहेत. एकीकडे प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल असताना रुग्णांना पुरेसे उपचार मिळत नाहीत. अशावेळी घरी क्वारंटाईन झाल्यानंतर रुग्ण बरा होईल का? असा प्रश्न रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर