शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

घाबरू नका, व्यवस्थित उपचार घ्याल, तर बरे व्हाल! 'जीबीएस' वर मात करून बरे झालेल्या तरुणाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:33 IST

डॉक्टर डिस्चार्जच्या वेळी फक्त घरी जाऊन फिजिओथेरपी करा, असे सांगतील, त्याला योग्यरित्या प्राधान्य द्या

पुणे: गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक उपचारक्षम आजार आहे. तो झाला म्हणून घाबरून जाऊ नका, व्यवस्थित उपचार करून घ्या, बरे व्हाल असे आशादायी आवाहन या आजारातून २०१९ मध्येच उपचार घेऊन बरे झालेल्या नीलेश अभंग यांनी केले. अभंग हे तब्बल साडेचार महिने या आजारामुळे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल होते.

‘लोकमत’ने अभंग यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी या आजाराची कथा सांगितली. ते म्हणाले, हा काही आता नव्यानेच सुरू झालेला आजार नाही. मला तो १९ जानेवारी २०१९ मध्ये झाला होता. त्याच दिवशी पहाटे मला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तिथून ३० मे २०१९ रोजी मी व्हेंटिलेटरवरून बाहेर आलो. तब्बल साडेचार महिने आयसीयूमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळं शरीर पॅरालाइज झालं होतं. फुप्फुसंही पूर्णपणे कमकुवत झाली होती, म्हणूनच व्हेंटिलेटरची गरज पडली. पण आता मी पूर्णपणे ठणठणीत झालो आहे. जे पॅरालाइज झालं होतं, ते फिजिओथेरपीमुळे पूर्वीसारखं झालं आहे.

फिजिओथेरपी आवश्यक

हात, पाय किंवा दोन्ही पॅरालाइज झालेले रुग्ण वेळीच योग्य उपचार घेतल्यास लवकर बरे होऊ शकतात. मात्र, यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांनी फिजिओथेरपीला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

फिजिओथेरपीसाठी नियमितपणा महत्त्वाचा

पॅरालाइज झालेले अवयव दुरुस्त करायचे असतील, तर फिजिओथेरपी हा एकमेव उपाय आहे. फिजिओथेरपीच्या नियमित उपचारांमुळे शरीरातील अवयव पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. मात्र, यासाठी रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी नियमितपणे चांगल्या फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली उपचार घ्यायला हवे. चालढकल किंवा आळस केल्यास शरीराचा तो भाग कडक होऊ शकतो, आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

नातेवाईकांची भूमिका महत्त्वाची

रुग्णांच्या नातेवाईकांनी या काळात त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. रुग्ण फिजिओथेरपीसाठी पूर्णपणे नातेवाईकांवर अवलंबून असतो. त्यांना फिजिओथेरपीच्या क्लिनिकमध्ये ने-आण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मात्र, हा वेळ आणि मेहनत वाया जाणार नाही, कारण सुरुवातीच्या काळात शरीर वेगाने प्रतिसाद देते.

डॉक्टरांच्या सल्ल्याला गांभीर्याने घ्या

डॉक्टर डिस्चार्जच्या वेळी फक्त घरी जाऊन फिजिओथेरपी करा, असे सांगतील. पण त्यांचे हे शब्द हलक्यात घेऊ नका. जर कायमचे अपंगत्व टाळायचे असेल, तर सुरुवातीच्या काळात फिजिओथेरपीला प्राधान्य द्या. वेळ न घालवता योग्य उपचार घ्या, अन्यथा उशीर झाल्यास त्याचा दिलासा मिळत नाही.

अपंगत्व टाळण्यासाठी तत्काळ पावले उचला

शरीर ताजेतवाने असताना, स्नायूंमध्ये ताकद असते, आणि लवकर सुधारणा होऊ शकते. पण वेळ गेल्यावर शरीर कठीण होऊ शकते आणि त्यावर उपचार निष्फळ ठरू शकतात. त्यामुळे अडचण निर्माण होण्याआधीच उपाय करा, असे सांगत अभंग यांनी जीबीएस रुग्णांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला.

हातांना किंवा पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेण्यास अडचण होणे ही काही लक्षणे दिसून येतात. पण योग्य उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. - डॉ. श्रद्धा मोरे, सहायक प्राध्यापक, केईएम रुग्णालय, मुंबई

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक