शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

सांगिसेचा पूल खचल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By admin | Published: July 07, 2017 3:27 AM

येथील सांगिसे पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. या

लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : येथील सांगिसे पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे तुटले आहेत़ पूल मध्यभागी खचला आहे़ पिलर वरील पुलाच्या लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत़ ठिकठिकाणी पुलाला चिरा पडल्या आहेत़ मध्यभागी पूल वाकलेल्या स्थितीत असल्याने पुला पलीकडे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.कामशेत जवळील वडिवळे गावातील इंद्रायणी नदीवरील सांगिसे पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असून दरवर्षी तीन ते चार वेळा पाण्याखाली जातो. वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याबरोबर कचरा व इतर वस्तू पुलाच्या पिलरला अडकल्याने पुढे वाहणाऱ्या पाण्यास अटकाव होऊन पुलाची मागील काही वर्षांपासून दुरवस्था होऊ लागली आहे. हा पूल सहा पिलर वर उभा असून पुलाचा मध्यभाग खचला असल्याने मोठ्या पावसात हा पूल वाहून जाण्याची शक्यता जाणकार माणसांकडून वर्तवली जात आहे. २९ जूनरोजी हा पूल पाण्याखाली गेला होता. त्या वेळी पुला पलीकडील आठ गावांचा संपर्क तुटला होता. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्या पावसातही हा पाण्याखाली जातो. तसेच लोणावळ्यावरून इंद्रायणी नदी मार्गे येणारा पाण्याच्या मोठा प्रवाहासमोर गेली अनेक वर्षे हा पूल तग धरून असला तरी मागील काही वर्षांमध्ये या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. सांगिसे व इतर नदी पलीकडील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या पुला पलीकडे वडीवळे, सांगिसे, बुधवडी, वळकं, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी ही आठ महत्त्वाची गावे असून या गावांना जोडणारा हा पूल या गावांचा दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग आहे. या साकवाची रुंदी कमी असून दोन मोठी वाहने एकाच वेळी या वरून जाऊ शकत नाही. पुलाच्या संरक्षण कठड्याचे लोखंडी पाईप गंजून खराब झाले आहेत. तर कठड्यांची दुरवस्था झाली आहे. वाहनाच्या किरकोळ धडकेत कठडे तुटले आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षण भिंतींचा अभाव आहे.ग्रामस्थांनी घाबरू नयेमावळातील तीन पुलांचे सर्वेक्षण केले असून यात सांगिसे, सांगवी व सांगवडे या पुलांचा समावेश आहे. या छोट्या पुलांचे पावसाळ्यानंतर मजबुतीकरण व दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता सुभाष क्षीरसागर यांनी दिली. शिवाय कामशेत जवळील सांगिसे पुलाची काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे़ पण हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले. पावसाळा झाल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येणार आहे.मालवाहू वाहनांची वर्दळयेथील अनेक भागात फुलांच्या कंपन्या व इतर शेतीपूरक उद्योगधंदे असल्याने दैनंदिन मोठी मालवाहतूक वाहने या पुलावरून ये-जा करीत असतात. याच प्रमाणे या भागात वीटभट्ट््यांचे प्रमाण जास्त असून मोठ-मोठे ट्रक व इतर वाहनांची या पुलावरून वाहतूक सुरू असते.