शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इंद्रायणीबाबत शिंदे, पवारांना सांगूनही फरक नाही, हे दुर्दैवच! निरंजननाथ महाराजांच्या भावना

By विश्वास मोरे | Updated: June 25, 2024 13:54 IST

पिंपरी : कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली ...

पिंपरी : कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, याबाबत कोणतीही उपाययोजना झालेली नाही, अशी आमची भावना आहे. वारीच्या अनुषंगाने इंद्रायणी प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार या संवेदनशील नेत्यांनी सांगूनही फरक पडत नसेल, तर दुर्दैव आहे, असे उद्वेगाने म्हणावे लागत आहे, अशी खंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह. भ. प. निरंजननाथ महाराज यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत निरंजननाथ महाराजांनी अत्यंत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. महाराज म्हणाले, 'वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त,  जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समवेत जेव्हा बैठका झाल्या. तेव्हा, देहू आणि आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर, नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबत कटाक्षाने प्रकाश टाकला. मात्र, यावर तोडगा निघालेला नाही, ही बाब दुर्दैवी आहे. दाद मागायची कोणाकडे?'

कार्तिकी उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. एवढंच नव्हे तर नदीचे कोणत्या भागामध्ये प्रदूषण होते, याबाबत अत्यंत सूक्ष्म माहिती दिली मात्र, एमपीसीबी आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे घडायचे तेच घडले. तीर्थक्षेत्र विकासाबाबत घोषणा केल्या जातात. मात्र, त्याबाबत प्रत्यक्षात कारवाई कमी होत आहे, अस संताप व्यक्त केला.

याला जबाबदार कोण-

निरंजननाथ महाराज म्हणाले, 'आषाढी-कार्तिकीच्या निमित्ताने वारकरी देहू आळंदीत येतात आणि 'ज्ञानोबा तुकोबा' असे स्मरत इंद्रायणीमध्ये स्नान करतात. जल प्रदूषणाची दूषित पाण्याची डुबकी त्यांना घ्यावी लागते आहे. पुणे जिल्ह्यातून वाहणारी इंद्रायणी आणि त्यापुढे होणारी भीमा थेट चंद्रभागेत जाऊन मिळते. आपल्या भागातील प्रदूषण युक्त पाणी पुढे जाते. वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.'  

आंदोलन करणे उपाय नाही-

नदी प्रदूषणाबाबत दाखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा काहींनी दिला आहे, याबाबत निरंजन महाराज म्हणाले, 'आंदोलन करणे हे फलित असू शकत नाही. यावर तोडगा काढण्याची गरज आहे. वारकऱ्यांना वीस हजार अनुदान देण्याबाबत समिती नेमली जाते. मात्र, नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी समिती नेमली नाही. ती तातडीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. नदी प्रदूषण का कोठे कसे होत आहे, याबाबत अहवाल घेऊन त्यावर तातडीने कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. जीवन देणारी इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे नदीचे पाणी जीवघेणी ठरू शकते.

त्याचा घाण वास येतो कसा?

मला वाटते, वारकरी संप्रदाय आणि प्रशासनाच्या बैठकांमध्ये केवळ चर्चा होते. मात्र, जलप्रदूषणावर प्रभावी उपाययोजना होत नाही. अधिकारी प्रशासन, गांभीर्याने घेत नाही, ही बाब राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. नदी प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळांने वेगळाच कयास काढलेला आहे. त्यांच्या मते संबंधित पाणी हे साबणाचे आहे, मग जर पाणी हे साबणाचे असेल, तर त्याचा घाण वास येतो कसा? याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. याबाबत राज्य शासन, जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहेत, त्यांनी नदीत इंद्रायणी मातेच्या प्रदूषणाचा विषय तातडीने दूर करण्याची गरज आहे. देहू-आळंदीत येणारे वारकरी श्रद्धेने इंद्रायणीत स्नान करतात. त्यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे,असे निरंजन महाराज म्हणाले.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpurपंढरपूरPuneपुणेindrayaniइंद्रायणी