शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्तीकर माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 07:07 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणात अडथळा ठरणारे थकीत शास्तीकराबाबत राज्य शासनाने आज धोरणात्मक निर्णय घेतला आहे

पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमितीकरणात अडथळा ठरणारे थकीत शास्तीकराबाबत राज्य शासनाने आज धोरणात्मक निर्णय घेतला आहे. निवासी बांधकामांची शास्ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने माफ झाली असल्याचे भाजपाचे शहराध्यक्षआणि आमदार लक्ष्मण जगतापयांनी पत्रकार परिषदेत सांगितले.राज्य शासनाच्या निर्णयाचा फायदा एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना होणारआहे. सुमारे तीन लाख मिळकतींना फायदा होणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजला होता. महापालिकेने शहरात ६६ हजार बांधकामे अनधिकृत आहेत, असे प्रतिज्ञापत्र २००८ मध्ये न्यायालयात सादर केले होते. दरम्यान १ आॅगस्ट २००८ नंतरच्या बांधकामांना दुप्पट शास्ती लावण्यात यावी, असा निर्णय काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. त्यामुळे महापालिकेने शहरातील बांधकामांना शास्ती लावली होती. आज अखेर शास्तीकराची सुमारे ४७६.३६ कोटी थकबाकी आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असले तरी अनधिकृत बांधकाम नियमित करताना शास्ती भरण्याची अट होती. त्यामुळे शास्तीकर हा पूर्वलक्ष्यी प्रभावाने संपूर्ण शास्तीकर माफ करावा, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांकडून होत होती. यावरून विरोधी पक्षांनी भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. महापालिका निवडणुकीपूर्वीसहाशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या बांधकामांना पूर्ण शास्ती माफ झाली होती. त्यानंतर महापालिकेने नवीन आदेशानुसार कार्यवाहीही सुरू केली होती. त्यानंतर राज्य शासनाने आज निर्णय घेतला आहे.याबाबत आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘शास्तीकराबाबत यापूर्वी निर्णय झाला होता. मात्र, पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर माफ नसल्याने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी अर्ज केले नव्हते. त्यामुळे राज्यसरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर माफ केला आहे. शहरातील बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यातून २०१५ पूर्वीची बांधकामे नोंदविल्यानंतर सुमारे तीन लाख मिळकतींना शास्तीकरातून सुटका होणार आहे.’’शास्तीवरून भाजपा लक्ष्यतसेच शास्तीकरावरून भाजपाच्या आमदारांना लक्ष केले होते. अनधिकृत बांधकामे आणि शास्तीसाठी पक्ष सोडला. आता भाजपानेही प्रश्न सोडविला नाही. त्यामुळे कोणत्या पक्षात जाणार अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसने भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर केली होती. त्यानंतर दोनच दिवसात याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. शास्तीवरून भाजपा लक्ष्य झाली होती.महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या नोंदणीनुसार शहरात एकूण ४ लाख ८६ हजार ७१५ मिळकती आहेत. त्यापैकी अनधिकृत मिळकतींची संख्या ७९ हजार १८९ मिळकती आहेत. २०१५ पूर्वीच्या बांधकामे नियमितीकरणाचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळेनोंद न केलेल्या मिळकतधारकांनाही नोंद करता येणार आहे. तसेच याबाबत महापालिकेच्या वतीने तातडीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात नवीन मिळकती अधिक प्रमाणावर मिळू शकतील, असेही जगताप म्हणाले.शासन निर्णयात गुंतागुंतराज्य शासनाच्या संकेतस्थळावर शास्ती संदर्भातील निर्णयाचा उल्लेख आहे. त्यात अनधिकृत बांधकामांवरील शास्ती पूर्वलक्ष्यी प्रभागाने सुधारणेचा महत्त्वपूर्ण निर्णय असे म्हटले आहे. मात्र, खालील मजकुरात शास्तीचे तीन स्लॅब केले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वीही अशाच प्रकारचा आदेश शासनाने काढलेला होता. त्यात आणि आताच्या निर्णयात काहीसे साम्य आहे. संकेतस्थळावरील अल्प माहितीवरून शासन निर्णयातील अचूकता पुढे आलेले नाही. निर्णयात गुंतागुंत अधिक आहे.सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकाम शास्तीबाबत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्ती माफ हे धोरण सरकारने स्वीकारले आहे. निर्णय आज झाला. त्यामुळे शहराच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. शास्तीकराच्या निर्णयाबाबत सरकारने षटकारमारला आहे.’’