शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

पाणीपुरवठ्याबाबत कागदी घोडे

By admin | Published: January 25, 2017 1:48 AM

येथील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पत्रव्यवहार करून

देहूगाव : येथील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत असून, ही योजना येथून पुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने चालविणार नसल्याचे कळविले होते. या पत्रावर देहूगाव ग्रामपंचायतीने व ग्रामसभेने आक्षेप नोंदवित काही मुद्दे उपस्थित करून ही पाणीपुरवठा योजना आहे तशी ताब्यात घेण्यास असमर्थता दाखविली होती, असे असूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील नागरिक केवळ पाणीपट्टी वसुलीसाठी सहकार्य करीत नसल्याच्या ठपका ठेवून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दुरूस्ती व देखभालीसाठी परवडत नसल्याचे कारण देत हस्तांतरण करून घेण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रपंच करीत आहे.यावर देहूगाव ग्रामपंचायतीने पुन्हा आक्षेप घेत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही, तोपर्यंत योजनेचे हस्तांतरण करणेत येणार नसल्याचे आणि नवीन पाणी पुरवठा योजना देहूसाठी योग्य व पुरेशी असेल, तरच नवीन पाणी योजनेसह सर्व पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्याबाबत विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांचा निर्णय घेण्यात येईल, याबाबत आपणास कळविण्यात येईल, तोपर्यंत ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेच चालवावी, असे निवेदनाद्वारे कळविले आहे. देहूगावला १९६७ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याच्या पाणी पुरवठा योजनेची क्षमता १.७५ दशलक्ष लिटर असून गावचा विकास होत असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच या परिसरातील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठा अनियमित होऊ शकतो म्हणत हा मुद्दा फेटाळला आहे. मीटरद्वारे पाणीपुरवठा करणेबाबत जीवन प्राधिकरण म्हणते की, ही पाणीपुरवठा योजनेत मीटर बसविण्याचे प्रयोजन नव्हते तर सर्व ग्राहकांना ठोस पाणी पुरवठा करावा असे प्रयोजन होते. त्यामुळे ही योजना हस्तांतरण प्रक्रियेकरीता हा मुद्दा योग्य वाटत नसल्याचे स्पष्ट करीत ग्रामपंचायतीने उपस्थित केलेले सर्व आक्षेप फेटाळले आहेत. (वार्ताहर)