शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

तीर्थरूपी इंद्रायणीची झाली गटार; महापालिका, पर्यावरण विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 13:31 IST

वारकऱ्यांची गंगा असणारी तीर्थरुपी इंद्रायणी आता गटारगंगा झाली आहे...

- विश्वास मोरे

पिंपरी :इंद्रायणी नदीच्या तीरावर भागवत धर्मातील वारकरी संप्रदायातील मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्यावर संत तुकाराम महाराजांनी कळस चढविला. पर्यावरणाचे महत्त्व वारकरी संतांनी सांगितले. मात्र, देहूगाव ते आळंदीपर्यंतच्या नदी मार्गावर नागरीकरण वाढले आहे. महापालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतींचे मैला शुद्धिकरणाचे प्रकल्प अपयशी ठरल्याने अजूनही सांडपाणी थेट नाल्यामधून इंद्रायणीत मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची गंगा असणारी तीर्थरुपी इंद्रायणी आता गटारगंगा झाली आहे.

आषाढीवारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देहू-आळंदीतून आलेला भक्तीचा प्रवाह थेट चंद्रभागेशी एकरूप होतो. मात्र, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आषाढीवारीच्या निमित्ताने वारकऱ्यांची माई असणाऱ्या इंद्रायणी नदीची ‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरुवारी पाहणी केली. त्यातून इंद्रायणी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले.

गावांतील सांडपाणी थेट नदीत

देहूगाव : देहूगावची लोकसंख्या चाळीस हजारांच्या आसपास आहे. तर गावातील मैला सांडपाणी आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्या टाकल्या आहेत. तर मैलापाणी प्रक्रिया करण्यासाठी गायराणवर मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारले आहे. त्याची दुपारी पाहणी केली असता, तो बंद होता. तर हा प्रकल्प सकाळी सुरू असल्याचे तेथील व्यवस्थापकांनी सांगितले. गावातील दोन नाल्यांतील पाणी थेट नदीत जाताना दिसून आले. तसेच येलवाडी आणि इतर गावांतील सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे दिसून आले.

मैलाशुद्धीकरण केंद्र १०० टक्के नाही कार्यान्वित ...

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीवर चिखलीत १६ दशलक्ष लिटरचे दोन शुद्धिकरण केंद्र व चऱ्होलीतील चाळीस दशलक्ष लिटरचा एक आणि वीस दशलक्ष लिटरचा एक असे दोन एसटीपी प्लांट आहेत. त्यांचे पाणी १०० टक्के प्रक्रिया होत नसल्याचे दिसून आले. शहरात सिंटेल बंधारा, तळवडे-चाकण रस्ता, तळवडे स्मशान भूमी, चिखली माई पूल, शेलारवस्ती तळवडे, मोशी टोलनाका, सस्तेवस्ती बंधारा, डुडुळगाव स्मशानभूमी, आळंदी आणि चऱ्होली स्मशानभूमी येथील नाल्यांतील सांडपाणी थेट नदीत जात आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणdehuदेहूAlandiआळंदीvarkariवारकरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड