शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
3
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
5
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
6
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
7
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
8
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
9
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
10
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
11
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
12
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
13
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
14
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
15
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
16
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
17
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
18
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
19
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

कामगार सुरक्षा रामभरोसे

By admin | Published: January 25, 2017 1:58 AM

ना मूलभूत सुविधांची पूर्तता, ना भविष्याची सुरक्षितता, ना आयुष्याची शाश्वती अशा चक्रव्यूहात शहरातील सव्वालाख कामगारवर्ग

भोसरी : ना मूलभूत सुविधांची पूर्तता, ना भविष्याची सुरक्षितता, ना आयुष्याची शाश्वती अशा चक्रव्यूहात शहरातील सव्वालाख कामगारवर्ग दोन वेळच्या अन्नासाठी धडपडत आहे. संघटित कामगारांना संघटनांचा पाठिंबा वेळोवेळी मिळतो व ते आपल्या सुरक्षेचे प्रश्न भक्कमपणे मांडू शकतात पण असंघटित कामगाराला वाली कोण, त्यांच्या अपघाती मृत्यूला कोण जबाबदार, कारखान्यांमध्ये सुरक्षा साधनांच्या पुरवठ्याबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती यंत्रणा कारणीभूत, असे अनेक प्रश्न कामगार सुरक्षेबाबत निरुत्तरित आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा मुख्य कणा असलेला कामगार वगार्ची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे. टाटा मोटर्स, बजाज आॅटो, मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, जनरल मोटर्स, एसकेएफ, अ‍ॅटलास कॅप्को, थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया, सॅण्डविक एशिया, अल्फा लाव्हल आदी लहान-मोठे सहा हजार उद्योग पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरात आहेत. या कंपन्यांत लाखो कामगार उदरनिर्वाह करतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करीत असताना यंत्रसामग्री व्यवस्थित व सुरक्षेच्या सूचना वाचून त्याचा वापर कसा करावा, याविषयी प्रशिक्षण दिले जाते. पण लघुउद्योग व छोट्या वर्कशॉपज्ञध्ये चालणा-या कामांमध्ये कामगारवगार्चं सुरक्षेसाठी योग्य साधने पुरवली जात नसल्याने अशा कंपन्यांमध्ये अपघात होतात. बऱ्याचशा कंपनी योग्य प्रशिक्षण व सुरक्षा साधने पुरवतात; पण यंत्रसामग्रीच्या चुकीच्या हाताळणीमुळे अनेक अपघात होताना यापूर्वीच्या काही घटनांमधून दिसून आले आहे. भोसरी, पिंपरी, चिंचवड एमआयडीसी क्षेत्रात हाताची बोटे तुटणे, पाय तुटणे, डोक्याला गंभीर इजा याविषयी होण्याचे प्रकार घडत आहेत. ज्या कामगारांना ईएसआय योजना लागू आहे. त्याच्यासाठी ईएसआय दवाखाने असून, औषध उपचार सोय आहे. इएसआय योजनाही व्यवस्थित राबवली जात नसल्याने ब-याचशा कामगारांना इएसआय सुविधा असूनही त्याचा योग्य लाभ मिळत नाही. यामुळे अपघात होऊ नये यासाठी सुरक्षित उपकरणे हाताळणे हे एकमेव उपाय आहे. कामगारांना कंपनीकडून सर्व सुरक्षेच्या साधनांचा पुरवठा होणे गरजेचे असून त्याचा योग्य वापरही होणे गरजेचे आहे. भोसरी एमआयडीसीमध्ये रासायनिक, ज्वालाग्राही,रबर, प्लॅस्टिक, अवजड स्वरूपाच्या अनेक कंपन्यात अनेक कामगार कुठल्याही सुरक्षिततेच्या साधनांशिवाय काम करतात. या कामगारांना मास्क, हेल्मेट, गमबुट, गॉगल, हातमोजे, सेफ्टीबेल्ट, सुरक्षा पोशाख अशी सुरक्षेसंबंधातील साधने पुरवणे बंधनकारक आहे. परंतु अनेक कामगार या साधनांशिवाय काम करताना दिसून येतात. त्यामुळेच जीवघेणे अपघात होऊन कामगारांचा जीव जाऊ शकतो.(वार्ताहर)