शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
3
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
4
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
5
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
6
"जाता जाता महायुती सरकारकडून महाउधळपट्टी, सरकारी जाहिरातींसाठी टेंडर मागून टेंडर’’, काँग्रेसची टीका   
7
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
8
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
9
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
10
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
11
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
12
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
13
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
14
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
15
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
16
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
17
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
18
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
19
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
20
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

बैलगाडा आंदोलनात नेत्यांचा कलगीतुरा

By admin | Published: January 23, 2017 2:33 AM

बैलगाडा शर्यतबंदीविरोधात सर्वपक्षीय नेते शनिवारी चाकण येथे एकवटले. मात्र मिळालेल्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी

चाकण : बैलगाडा शर्यतबंदीविरोधात सर्वपक्षीय नेते शनिवारी चाकण येथे एकवटले. मात्र मिळालेल्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करणार नाही ते नेते कसले? मिळालेल्या प्रत्येक व्यासपीठाचा नेते राजकारणासाठी वापर करताना दिसतात. त्यासाठी दशक्रियेचा घाटही अपवाद नसतो. नुकत्याच आलेल्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे पहिल्यांदाच सर्वपक्षीय नेते बैलगाडा आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या व्यासपीठावरून ते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.या वेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीचे राजकारण करीत कित्येकांनी खासदारकी व आमदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवला. परंतु अजूनही या शर्यतीकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. निवडून आल्यावर एक महिन्यात बैलगाडा शर्यत चालू करतो म्हणणाऱ्यांनी आता राजीनामे द्यावेत, असे म्हणताच सर्व उपस्थितांच्या नजरा खासदार आढळराव यांच्याकडे वळल्या. यावर शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी मोहिते यांच्याकडे कटाक्ष टाकून म्हणाले की, हे बैलगाड्यांचे आंदोलन आहे, बैलगाडामालकांच्या मागे उभे राहायचे असेल तर मागचं काही काढू नका. बैलगाड्याच्या आंदोलनासाठी सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी राजकीय जोडे बाहेर काढून आंदोलनासाठी एकत्र यावे. या ठिकाणी राजकारण करू नये, असा टोला मारला.त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा सुरू करण्यासाठी आतापर्यंत काय काय केले, याचा अक्षरश: पाढाच वाचून दाखविला. ते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीमध्ये कुणी राजकारण आणू नये. आपण चारजण एकमेकांवर टीका करतोय, ठेवा राजकारण बाजूला.... क्षणभर स्तब्ध होऊन... आता कोणत्याच पक्षाचा आवाज काढायचा नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, बीजेपी, काँग्रेस कुणीच जिंदाबाद नाही. सगळे मिळून सुप्रीम कोर्टात लढा देऊ. आंदोलन संपल्यानंतर भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे आंदोलनस्थळी उशिरा पोहोचले. त्या वेळी इतर पक्षांचे नेते निघून गेले होते. लांडगे येताच भाजपचे नेते शरद बुट्टे व तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्यात जान आली अन् ते त्यांना बिलगले. त्यांनी पुन्हा वैशाली कॉम्प्लेक्ससमोर आंदोलन सुरू केले आणि राजकारण न करता बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वच नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून बैलगाडा मालकांच्या मागे खंबीर उभे असल्याचे सांगितले, यात मात्र शंका नाही. सगळ्या नेत्यांनी सांगितले असले तरी कोण कुणाच्या मागे जातो हे अखेरपर्यंत सांगता येत नाही, त्यामुळे बैलगाडामालकांपुढे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न उभा राहिला आहे.(वार्ताहर)