शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मरणानंतरही अवयवदानातून जिवंत राहता येतं : अवयवदानाबद्दल जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:43 IST

अवयवदानाबद्दल आजही अनेक गैरसमज असल्याने हे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे कित्येक गरजवंत अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देअवयवदान जनजागृतीसाठी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचा पुढाकारएका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात जणांचे प्राण वाचू शकतात.

रावेत : अवयवदान ही काळाची गरज आहे.लाखो रुग्णांना योग्य अवयव नसल्यामुळे आयुष्यभर अपंगत्वात जगावे लागते. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे मरणानंतर जिवंत राहण्यासाठी अवयवदान करणे आवश्यक आहे. हा धागा पकडून रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखीच्या परतीच्या प्रवासात अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यात आली. या प्रवासामध्ये १० जणांनी अवयवदान केले.अवयवदान जनजागृती मोहिमेत अध्यक्ष प्रदिप वाल्हेकर,  गणेश बोरा, सुभाष वाल्हेकर,  अ‍ॅड. सोमनाथ हरपुडे,  सचिन काळभोर,  संदीप वाल्हेकर,  सुनील कवडे, स्वाती वाल्हेकर, वसंत ढवळे, शेखर चिंचवडे, विनायक घोरपडे आदी उपस्थित होते. बिर्ला हॉस्पिटल आणि वात्सल्य दिव्यांग मुलांचे पुनर्वसन केंद्र संस्थेच्या सदस्यांनी यासाठी सहकार्य केले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने उद्या (गुरुवारी) अवयवदान मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड घेणार आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. अवयवदानाबद्दल आजही अनेक गैरसमज असल्याने हे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे कित्येक गरजवंत अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.प्रदीप वाल्हेकर म्हणाले, एखाद्या व्यक्तीने अवयवदानाचा निर्णय घेतला, तर त्यामुळे भविष्यात सात जणांचे प्राण वाचणार आहेत. सात जणांना या जगात आनंदाने राहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मृत्यूनंतर देखील जिवंत राहण्यासाठी अवयवदान करणे महत्वाचे आहे. शहरातील सर्व रोटरी क्लब आणि इतर संस्था मिळून गुरुवारी (दि. ९) अवयवदान जनजागृतीचा विक्रम करणार आहेत. त्याची नोंद लिंक बुक आॅफ रोकोर्डमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.......अवयवदान मोहिमेत सहभागी होण्यासाठी हे करा अवयवदान करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आॅनलाईन पद्धतीने देखील ते करता येणार आहे. त्यासाठी ६६६.ॅ्रा३ह्ण्राी.ूङ्म.्रल्ल या संकेतस्थळावर सुरुवातीला आपले नाव नोंदवावे लागेल. त्यानंतर अवयवदानाचा फॉर्म भरून अवयवदान मोहिमेत सहभागी झाल्याचे नोंदविण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु ही नोंदणी ९ आॅगस्ट (गुरुवार) या एकाच दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेतच करणं आवश्यक आहे.

टॅग्स :ravetरावेतSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा