शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आमदार-खासदार साहेब आता तरी कोंडी सोडवा ओ..! २० वर्षांपासून चाकणकर करताहेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 18:58 IST

चाकण : मागील वीस वर्षांपासून चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. कोंडी हटवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात ...

चाकण : मागील वीस वर्षांपासून चाकणच्यावाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. कोंडी हटवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत; मात्र त्याही तोकड्या पडल्याने वैतागलेल्या चाकणकर नागरिकांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे. खासदार-आमदार साहेब आता तरी चाकणची कोंडी सोडवा ओ अशी मागणी केली आहे.चाकणची वाहतूक कोंडी कोण सोडवणार ? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. नेत्यांच्या कामांच्या घोषणा झाल्या आणि आश्वासने झाली; परंतु प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. निवडणुका आल्या आणि गेल्या;परंतु चाकणकर नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. वाहतूक कोंडीत दररोज चाकणकर नागरिक, उद्योजक, कामगार, विद्यार्थी व शेतकरी भरडला जात आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्णांना उपचारात प्रचंड अडथळे येत आहेत. या मार्गाने ये-जा करणाऱ्या राज्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे; परंतु वाहतूक कोंडी काही केल्या सुटत नाही. या मार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडी झाली आहे का ? यासाठी पहिला गुगल मॅप चेक करून जावे लागत आहे. त्यामुळे चाकणमधील प्रवास नकोसा वाटत आहे.वाहतूक कोंडीचा सर्वांत मोठा फटका चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार व कंपन्यांना बसत आहे. चाकण - शिक्रापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्याचबरोबर कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य शासनाला मिळत असतानाही या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही सुटला नाही.यामुळे याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसत असल्याने कंपन्या-उद्योग दुसरीकडे स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.विस्तारीकरणाचे काम संथगतीने सुरूचाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.सध्या पुणे-नाशिक महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे; मात्र रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व रोहित्र यामुळे विस्तारीकरणाला अडथळा निर्माण होत आहे.या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच या भागातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकते.पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथील तळेगाव चौक व आंबेठाण चौक या दोन्ही चौकांमध्ये उंचावरील स्काय वाक ( पादचारी फुल ) उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChakanचाकणTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPuneपुणेPoliceपोलिस