शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

कृषिवाढीस अर्थसंकल्पात भरीव तरतुदींची गरज - भालचंद्र मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:23 IST

देशाच्या विकासदरात सातत्याने घट होत असूनही राज्यकर्ते ती मान्य करत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. आर्थिक महासत्तेचा डांगोरा पिटणे बंद केले पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल तर सरकारने रोजगारविषयक धोरणावर लक्ष केंद्रित करावे, असंघटित बेरोजगारांना नोकरीच्या संधी निर्माण करून द्याव्यात़

तळेगाव दाभाडे : देशाच्या विकासदरात सातत्याने घट होत असूनही राज्यकर्ते ती मान्य करत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. आर्थिक महासत्तेचा डांगोरा पिटणे बंद केले पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल तर सरकारने रोजगारविषयक धोरणावर लक्ष केंद्रित करावे, असंघटित बेरोजगारांना नोकरीच्या संधी निर्माण करून द्याव्यात़ राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असून उद्ध्वस्त होत असलेल्या कृषिवाढीसाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूदीची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ‘भारताचे सध्याचे आर्थिक धोरण’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव, संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, गोरक्षनाथ काळोखे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, डॉ. दत्तात्रेय बाळसराफ, डॉ. संभाजी मलघे आदी उपस्थित होते.डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव यांना ‘कृष्णराव भेगडे साहित्यभूषण पुरस्कार’ प्रदान केला. दरम्यान, ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राष्ट्रीय महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करणार असल्याचे मुणगेकर यांनी नमूद केले. प्रास्ताविक रामदास काकडे यांनी केले. प्राचार्य दत्तात्रेय बाळसराफ यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले. तर आभार शैलेश शाह यांनी मानले.दोन कोटी रोजगार देण्याच्या वल्गना झाल्या़ मात्र प्रत्यक्षात केवळ ७ ते ८ लाख लोकांनाच रोजगार मिळाला. सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळाले नाही तर विघातक वृत्ती जोपासल्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिक्षण व आरोग्यासारख्या जीवनावश्यक व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा सपाटा केंद्र व राज्य सरकारने लावला असल्याचा थेट आरोप करताना त्यांनी शाळाबंदी आणि रुग्णालयांचे खासगीकरण यावर सडकून टीका केली. - डॉ. भालचंद्र मुणगेकर

टॅग्स :Bhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड