शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

चारित्र्य संवर्धन कृतीतूनच शिकवण्याची आवश्यकता

By admin | Published: January 25, 2017 1:50 AM

चारित्र्य संवर्धनाचे कार्य हे सांगून होणार नसून ते कृतीतून शिकवायला हवे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले

लोणावळा : चारित्र्य संवर्धनाचे कार्य हे सांगून होणार नसून ते कृतीतून शिकवायला हवे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले यांनी व्यक्त केले. मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने आयोजित ‘२१व्या शतकातील नव्या पिढीच्या चारित्र्यसंवर्धनाचा सर्वांगिन विकासह्ण तीन दिवसीय शिक्षण परिषदेचा समारोप रविवारी ताकवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. यावेळी भारतीय जैन संघटना व शांतीलाल मुथा फाऊंडेशनचे प्रमुख शांतीलाल मुथा, मनशक्ती सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय कुवळेकर, मनशक्ती कृती समितीचे अध्यछ गजानन केळकर, संचालक प्रमोदभाई शिंदे व्यासपिठावर उपस्थित होते. परिषदेत महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमधून चारशे शिक्षक सहभागी झाले होते.शिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉ. ताकवले म्हणाले, मन म्हणजे आत्मा आहे व आत्म्याचा विचार चांगला असला तर बुध्दी चांगली चालते. याकरिता चांगली बुध्दी, कृती व भावमार्ग मुलांना कसे देता येतील याचा विचार व्हायला हवा. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, सगळ्या जगांची माहिती एका क्षणात मुलांना उपलब्ध होत असताना त्यामधील काय घ्यायचे व काय सोडायचे हे कृतीतून समजून सांगायला हवे. याकरिता भावविश्व चांगले करुन ते मुलांना शिकवा. मुथा म्हणाले, जागतिक वातावरण आपण बदलू शकत नाही. तेव्हा त्या वातावरणाचा सामना करु शकतील अशी मुलं घडवा. समारोप सत्रांची प्रस्तावना प्रमोद शिंदे यांनी केली. डॉ. वर्षा तोडमल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)