शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

शहर विद्रुपीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Published: January 25, 2017 1:50 AM

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणे, विजेचे खांब, पोस्टाच्या पेट्या व झाडे आदी ठिकाणी चिटकवण्यात आलेल्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणे, विजेचे खांब, पोस्टाच्या पेट्या व झाडे आदी ठिकाणी चिटकवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे दिसत आहे. तरीही प्रशासनाकडून अशा जाहिरातदारांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे. स्वच्छ भारत या अभियानांतर्गत शासकीय व निमशासकीय संस्था, विद्यालय व महाविद्यालयांमार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या संदर्भात शहरातील अनेक ठिकाणी जनजागृती मोहीम राबविल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे स्वच्छतेसाठी आटापिटा केला जात आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी चिटकवण्यात आलेल्या जाहिरातींमुळे शहर विद्रूप बनत चालले आहे. असा विरोधाभास दर्शवणारी परिस्थिती झाली आहे.जाहिरात मार्केटिंगचे महत्त्वाचे माध्यम आहे. परंतु, याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. जाहिरातींसाठी सार्वजनिक ठिकाणांचाही सर्रास उपयोग करतात. बस थांबा, पोस्टाच्या पेट्या, विजेचे खांब व भिंती यांच्यावर छोट्या-मोठ्या जाहिराती चिटकवल्या जातात. काही बस थांब्यावर बसच्या वेळापत्रकावरच जाहिराती लावल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)