शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

रिंगरोडमधील बाधितांचे नाही सर्वेक्षण

By admin | Published: July 08, 2017 2:25 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाकडून रिंगरोडमधील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाकडून रिंगरोडमधील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू झाली आहे. महापालिका आणि प्राधिकरण परिसरात किती बांधकामे बाधित होणार आहेत, याची माहिती प्रशासनाकडे नाही. तीस वर्षांनंतर हा रिंगरोड आवश्यक आहे का? हाही संशोधनाचा विषय आहे. बाधितांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन न करताच रिंगरोडच्या भूसंपादनाची घाई सुरू झाली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आराखडा करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित रिंगरोडचे नियोजन केले होते. सुमारे तीस वर्षांपूर्वी रिंगरोडचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही प्रशासनांनी रिंगरोडच्या जागेचा ताबा घेतला नाही. त्यामुळे या प्रस्तावित रस्त्याबाबत संदिग्धता होती. तसेच यासंदर्भातील आरक्षण फक्त प्रस्तावित केले मात्र, त्यानंतरची कारवाई आजपर्यंत प्रशासनाने केलीच नाही. परिणामी संबंधित जागांवर नागरिकांनी घरे उभारली. तीस वर्षांनंतर रिंगरोड निर्माण करण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांनी आखले आहे. त्यानुसार काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, चिंचवड परिसरातून कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात रहाटणी आणि काळेवाडीतील काही भागांतील भूसंपादन केले आहे. कारवाईच्या भीतीने नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.१५०० नागरिक विस्थापिततीस वर्षांनी रिंगरोड भूसंपादनाची कारवाई सुरू झाली आहे, त्यामुळे थेरगाव आणि चिंचवड परिसरात या रस्त्यामुळे सुमारे तीन हजार कुटुंबे म्हणजे सुमारे पंधरा हजार नागरिक विस्थापित होणार आहेत. या रस्त्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न नागरिक सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत.नेत्यांनी अभ्यास करावासामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘‘तीस वर्षांनंतर रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे. सत्तेच्या जोरावर नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरविला जात आहे. आता या रस्त्याची गरज आहे का? कितीपत आवश्यकता आहे. केवळ राजकीय उद्देशातून केला जात आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांनी अभ्यास करून नागरिकांच्या हिताचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.