शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Published: July 17, 2017 4:08 AM

शुक्रवारपासून (दि १४) दत्त मंदिर परिसर, वाकड येथील कित्येक सोसायट्यांचा विद्युतपुरवठा गेले ३६ ते ४८ तासांपेक्षा अधिक वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : शुक्रवारपासून (दि १४) दत्त मंदिर परिसर, वाकड येथील कित्येक सोसायट्यांचा विद्युतपुरवठा गेले ३६ ते ४८ तासांपेक्षा अधिक वेळ अचानक खंडित झाल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील समस्या सुटत नसल्याचे अखेर रहिवाशांनी महावितरण अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून समस्यांचा पाढा वाचला. वाकडमधील दत्तात्रय देशमुख (मॅक्झिमा सोसायटी), युवराज हुगे व बाळकृष्ण कलाटे (नंदन इन्स्पेरा सोसायटी) या रहिवाशांनी या बैठकीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. वाकडच्या विविध सोसायट्यांतील २५० पेक्षा अधिक रहिवासी सहभागी झाले होते. बैठकीला महावितरणकडून सांगवी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन. के सूर्यवंशी आणि सहायक अभियंता प्रकाश नाईकवाडे हे उपस्थित होते. वेदान्त, आयकॉन ग्रीन, गोल्ड फिंगर या खंडित वीजपुरवठ्याची झळ बसलेल्या सोसायट्यामध्ये तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या व्यतिरिक्त विद्युतपुरवठ्यातील समस्यांविषयी अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्युतपुरवठा वारंवार खंडित होणे, खंडित पुरवठा कमी दाबाने पुन:स्थापित झाल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, संगणक आदी मौल्यवान उपकरणांचे नुकसान होणे. लिफ्ट बंद पडणे, पाणीपुरवठा न होणे, मोबाइल चार्जिंग न होणे, गिझर, फ्रीज न चालणे अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले. याशिवाय परिसरात अनेक डीपीला झाकणे नाहीत, विजेची वाढीव बिले व त्याचे तत्काळ निराकरण होत नाही अशा समस्या नागरिकांनी मांडल्या. येथील वीजपुरवठा यंत्रणा खूप जुनी असल्याने तिची देखभाल आणि नियंत्रण अत्यंत जिकीरीचे झाले आहे. या ठिकाणी काम करताना महावितरण कर्मचाऱ्यांचे प्रसंगी प्राण धोक्यात येण्याचीही शक्यता असते. येथील पुरवठा हिंजवडी आणि जगताप डेअरी येथील केवळ वाहिन्यावरून गेली कित्येक वर्षांपासून होत आहे. या कालावधीत ग्राहकांचे संख्येत प्रचंड वाढ झाल्याने व्यवस्थेवर ताण येत आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे पुरवठ्यावर परिणाम होऊन नेमक्या कोणत्या ठिकाणी आर्द्रता निर्माण झाली आहे हे शोधणे अवघड जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाला विलंब होतो असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. सलग दोन दिवस बत्ती गुल असल्याने रहिवाशांची घालमेल सुरु असल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख आणि स्थानिक नगरसेवक राहुल कलाटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. महावितरणच्या सातत्याने अनेक चुका सुरूच असल्याने गैरसोय सुरु आहे. लवकर तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.