शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

पवना नदीपात्र अरुंद

By admin | Published: January 25, 2017 1:49 AM

नवी सांगवी, दापोडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर आदी परिसरांमध्ये पवना नदीपात्रात राडारोड्याचा भराव टाकून

पिंपळे गुरव : नवी सांगवी, दापोडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर आदी परिसरांमध्ये पवना नदीपात्रात राडारोड्याचा भराव टाकून सपाटीकरण करून जागा बळकावण्याला वेग येत आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊन नदीला ओढ्याचे स्वरूप येण्याची भीती निर्माण होत आहे. जमिनीला सोन्याचा भाव आल्याने नदीपात्राच्या जागेत राडारोड्याचे भराव टाकून टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. पवना नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. महापालिकेच्या निवडणुकीमुळे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांतून सुरु आहे. शासन व महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने नदी सुधारसाठी अनेक योजना राबविल्या जातात. लाखो रुपये खर्चही केले जातात. तसेच महापालिकेच्या अधिकारयांकडून पूररेषा नियंत्रणासाठी पाहणी केली जाते. वर्षभरातून एकदाच पाहणी होते. मात्र पुन्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. आजही पवना नदीपात्रात भराव टाकून सर्रासपणे जागा बळकावून बांधकामे सुरू असल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे. पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर नदीपात्रातील इमारती पाण्यामध्ये कोसळण्याची शक्यता टाळता येणार नाही. पवना नदीपात्रालगत हॉटेल, मोटार गॅरेज, भंगाराची दुकाने आदींचे साम्राज्य वाढले आहे. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातही महापालिकेने पाहणी करून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. या दुर्लक्षपणामुळे प्रशासनाला नागरिकांची आणि नागरिकांना भविष्याची काळजी नसल्याचे दिसून येत आहे. नदीतील प्लॅस्टिकयुक्त वाढता कचरा, दुर्गंधीयुक्त पाणी, वाढती जलपर्णी आदीमध्ये पवनेचा श्वास कोंडला आहे. नदीपात्रातील राडारोडा टाकण्यास प्रतिबंध करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र हे सर्व कागदोपत्रीच असल्याचे दिसून येते. संबंधित बीट निरीक्षकांनी ही आपली जबाबदारी चोख बजावणे गरजेचे आहे. अन्यथा नद्यांना नाल्याचे स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही. तसेच नदी की ओढा ओळखता येणार नाही. या सर्व गोष्टीवर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)