शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिंपरी-चिंचवडकरांनी अनधिकृतची चिंता करू नये - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 01:23 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला. न्यायालयाने काल जो निर्णय दिला तो आरक्षित जागेवरील अतिक्रमणासाठी होता. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी चिंता करू नये, न्यायालयाच्या आधारानेच बांधकामे नियमित होणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला. न्यायालयाने काल जो निर्णय दिला तो आरक्षित जागेवरील अतिक्रमणासाठी होता. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी चिंता करू नये, न्यायालयाच्या आधारानेच बांधकामे नियमित होणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने अटल संकल्प महासंमेलन निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर शनिवारी झाले. लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महासंमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मावळचे आमदार बाळा भेगडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार बाबूराव पाचर्णे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड आदी उपस्थित होते. पक्षनेते एकनाथ पवार यांनी स्वागत केले. महापौर राहुल जाधव यांनी आभार मानले.शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळायला हवा, असा दावा आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला.‘‘आम्ही भाजपा सोडणार या आवई उठविल्या जात आहेत. मी आणि भाऊ आम्ही तात्पुरते भाजपात आहेत, असा अपप्रचार केला जात आहे.बदनामी करण्याचे राजकारण करू नका, गाठ पैलवानाशी आहे. माझ्याकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत. वेळ पडल्यास बाहेर काढू, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला.अटल कार्यकर्ता संमेलनातील गर्दीने मदनलाल धिंग्रा मैदान खचाखच भरले होेत. संमेलनात सुरुवात होताच ‘संमेलनाच्या फलकाला फुगे बांधलेले होते. पाहुण्यांनी हे फुगे हवेत सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही काळ ते फुगे हवेत उडालेच नाहीत.न्यायालयाचा निर्णय हा आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांसंदर्भातील मुंबईची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार? याबाबत उत्सुकता होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम धारकांनी चिंता करू नये. न्यायालयाकडून काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून सरकारनेदक्षता घेतली होती. कालचा न्यायालयाचा निर्णय हा आरक्षितजागेवरील बांधकामांविषयी होता. आरक्षणाच्या जागेवरील बांधकामे नियमित करताना जागा देणे आवश्यक आहे. पिंपरीतील बांधकामे नियमित होणार आहेत.’’

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड