शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

नदी सुशोभीकरणाचा घाट कोणासाठी, कशासाठी? पर्यावरणवादी संघटनांसह नागरिकांचा सवाल

By विश्वास मोरे | Updated: March 27, 2025 12:17 IST

- वृक्षसंवर्धन आणि नद्यांच्या आरोग्याकडे, नैसर्गिक सौंदर्याकडे दुर्लक्ष; नदीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप

पिंपरी : पर्यावरणवादी संघटनांच्या सूचनांना कचऱ्याचा डबा दाखवत पिंपरी-चिंचवड महापालिका मुळा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प दामटत आहे. महानगरे रचत असताना वृक्षसंवर्धन आणि नद्यांच्या आरोग्याकडे, नैसर्गिक सौंदर्याकडे दुर्लक्ष होत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे जीवनदायिनी मुळा विषगंगा होत असतानाच, आधी भराव आणि आता नदी सुधारच्या नावाखाली नदीचा गळा घोटला जात आहे. नदी सुशोभीकरणाचा घाट कोणासाठी, कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून तीन नद्या वाहतात. वारकरी संप्रदायाच्या भक्तिमार्गाचा उगम इंद्रायणीच्या तीरावरून झाला म्हणूनच भक्ती आणि शक्तीची भूमी असेही तिला म्हटले जाते. पवनाचे मावळ तालुक्यातील शिवणे ते दापोडीपर्यंत उगम ते संगम असे ४५ किलोमीटरचे आणि इंद्रायणीचे लोणावळ्यातील कुरवंडे ते तुळापूरपर्यंत उगम ते संगम असे १०५ किलोमीटरचे, तर मुळा नदीचे मुळशी ते बोपखेल असे १८.५ किलोमीटरचे क्षेत्र आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून पवना नदीचे २४.३०, इंद्रायणीचे २०.८५ किलोमीटरचे, तर मुळा नदीचे १८.५ किलोमीटर नदीपात्र आहे. या नद्यांचा उल्लेख इतिहासातही आहे. आता या नद्यांमध्ये सांडपाणी जाणार नाही, यावर उपाययोजना करण्याऐवजी नदी सुशोभीकरणाचा घाट घातला आहे.

८० टक्के पाणी प्रक्रिया केल्याचा दावा

गेल्या वीस वर्षात नद्यांच्या तीरावर नागरीकरण, औद्योगिकरण वाढले आहे. सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमुळे निर्माण होणारे रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करताच नदीत मिसळत आहे. हिंजवडीपासून बोपखेलपर्यंत १२ नाले पवना नदीत सोडले आहेत. फक्त ८० टक्के पाणी प्रक्रिया केली जात असल्याचा दावा पर्यावरण अहवालातून केला जात आहे.

नवे काहीतरी करण्याच्या नादात काय साध्य करणार ?

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा नवे काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. जनतेची बाजू मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध नसल्याने, लोकनियुक्त समिती नसल्याने ‘हम करे सो कायदा’ यानुसार प्रशासन चालत आहे. मात्र, नदीकाठची महावने, नैसर्गिक सौंदर्य नष्ट करून काय साध्य करणार आहात, असा प्रश्न पर्यावरणवादी संस्था विचारत आहेत.

आवाज आयुक्तांपर्यंत पोहोचेना ..!

नदी सुधार प्रकल्पाची चर्चा गेल्या वीस वर्षांपासून होत आहे. प्रदूषणांबाबत पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, जलदिंडी, इंद्रायणी सेवा फाउंडेशन, जलबिरादरी या संस्था सजगपणे भूमिका बजावत आहेत. त्यांचे अहवाल लालफितीच्या कारभाराने गडप केले आहेत. त्यांचे रुदन आयुक्तांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेWaterपाणीwater shortageपाणीकपात