शहरं
Join us  
Trending Stories
1
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
2
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
3
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
4
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
5
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
6
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
7
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
8
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
9
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
10
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
11
पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी फरार, संतप्त जमावाकडून तोडफोड
12
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
13
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
14
Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?
15
तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत
16
झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?
17
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
18
"नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' ", काँग्रेसची बोचरी टीका     
19
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
20
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...

आज पडणारे प्रश्न उद्याचे संशोधन ठरेल

By admin | Published: January 09, 2017 2:36 AM

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय

निगडी : विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय. नुसते पदवीधर होण्याने पुढे काही घडत नाही. वाचनामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. अनेक मोठी माणसे वाचनानेच घडली आहेत. जगात ग्रह, तारे, विमाने अशा कल्पना मांडल्या गेल्या. त्या दिशेने शोध लागत गेले, अशा गोष्टी वाचल्याशिवाय आणि जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मनुष्याची प्रगती अशक्य आहे,असे प्रतिपादन ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.निगडीतील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या दिशा सोशल फाउंडेशनच्या साहित्यिक आपल्या दारी उपक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, उपकार्याध्यक्ष अण्णासाहेब भोसले, मानद सचिव बाबूराव जवळेकर, खजिनदार वसंत पवार, प्राचार्या शुभांगी इथापे, अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचेमाजी उपसभापती नाना शिवले उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘मुलांच्या दृष्टीने जगणे जितके महत्त्वाचे तितकेच जगण्याकडे उघड्या डोळ्यांनी बघणेही महत्त्वाचे असते. मुलांनी सतत प्रश्न विचारले पाहिजेत. कारण जगात जिथे प्रश्न निर्माण होतात तिथेच नवीन काही घडत असते. प्रश्न विचारणे हे ज्ञानाच्या शोधार्थ निघण्याची पहिली खूण असते. याकरिता मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होण्यासाठी आणि विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी आपला व्यासंग वाढविला पाहिजे. ’’शिवले यांनी प्रास्ताविक केले. संजय कुऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. चेतन महाजन यांनी आभार मानले. उपक्रमाचे संयोजन बाळू गावडे, किरण थोरात, रवींद्र खेडकर व दिशाचे संचालक गुरुदास भोंडवे, प्रवीण कुदळे, नंदकुमार कांबळे, रोहित खर्गे, किशोर जवळकर, संतोष चांदेरे, अविनाश ववले, महेंद्र चिंचवडे, विजय कांबळे यांनी केले. (वार्ताहर)