शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शुक्रताऱ्यातील प्रेमळ हास्य लोपले : सुवर्णा माटेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:11 IST

पुण्यातील खडकमाळ आळी येथे अरुण दाते यांच्या शुक्रतारा या संगीत कार्यक्रमातून त्यांच्याबरोबरच्या स्नेहबंधाला सुरुवात झाली. १९९७ चा काळ असावा तो. त्यानंतर पुढे साधारण चार ते पाच वर्षे मला त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य म्हणावे लागेल.

पुण्यातील खडकमाळ आळी येथे अरुण दाते यांच्या शुक्रतारा या संगीत कार्यक्रमातून त्यांच्याबरोबरच्या स्नेहबंधाला सुरुवात झाली. १९९७ चा काळ असावा तो. त्यानंतर पुढे साधारण चार ते पाच वर्षे मला त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य म्हणावे लागेल. आम्ही सर्व जण त्यांना अरुभय्या या नावाने हाक मारायचो. मूळच्या इंदूरच्या असणाºया अरुभय्यांच्या वागण्यात एक रुबाब होता. आदब, आदर होता. लहान असो वा मोठे त्यांच्या बोलण्यातील मार्दव खूप लोभसवाणे होते. खासकरून नव्या सहकलाकारांना धीर देण्याचे काम ते मोठ्या खुबीने करायचे. याविषयीचा एक संस्मरणीय प्रसंग आठवतो. खडकमाळ आळीत मी पहिल्यांदाच त्यांच्या शुक्रतारा कार्यक्रमात सहभागी झाले. अरुभय्यांची गाण्यांची यादी तयार होती. कुठल्या वेळी कोणते गाणे गायचे, हे त्यांचे पक्के होते. माझ्या मनावर कमालीचे दडपण होते. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी, जिथे जागा मिळेल अशा ठिकाणी रसिकांची दाटी पाहून मला भीती वाटली. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर अरुभय्या यांनीच माझ्यात आत्मविश्वास भरला. ते श्रोत्यांना म्हणाले, की आजच्या कार्यक्रमाला माझ्या सहकारी नवीन आहेत. त्यानंतर तो कार्यक्रम सुंदर रंगला. रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली.जेव्हा केव्हा मुंबई अथवा इंदूरला जाणे व्हायचे त्या वेळी ते आवर्जून घरी बोलवायचे. खाऊपिऊ घालायचे. विशेषत: डाळ बाटी. त्यांच्या पत्नी मीनाताई यादेखील अतिशय प्रेमळ. अरुभय्यांच्याबाबतीत सांगायचे झाल्यास ते अतिशय न्रम स्वभावाचे होते.कुठल्या अभिनेत्याकरिता पार्श्वगायन करून ते मोठे झाले नाहीत, तर त्यांच्या शुक्रतारा या कार्यक्रमांतील हृदयस्पर्शी भावगीतांमुळे ते आबालवृद्धांमध्ये कमालीचे लोकप्रिय होते. त्यांच्या स्वभावात दिलदारपणा होता. प्रचंड समजूतदारपणा, सहकाºयाला पाठिंबा देणे, यामुळे ते सगळ्यांना हवेहवेसे वाटायचे. त्यांच्याबरोबर मराठवाडा, विदर्भ, कोकण येथे दौरे करण्याचा योग आला. त्याप्रसंगी त्यांचे गाणे ऐकण्यासाठी रसिकांनी केलेली गर्दी पाहून अचंबा वाटायचा. ज्या काळात मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीचेदेखील फारसे प्रस्थ नव्हते, त्या काळात त्यांच्या मैफलीत रसिक दाटीवाटीने बसून ‘शुक्रतारा’ कार्यक्रमाचा आनंद घ्यायचे. अरुभय्या त्यांच्या यशाचे श्रेय हे नेहमी गीतकार आणि संगीतकारांना द्यायचे. कुठल्याही गोष्टीचे काहीही झालेतरी श्रेय घ्यायचे नाही, असा त्यांची वृत्ती होती.केतकी ज्या वेळी लहान होती. तेव्हा एकदा तिला घेऊन अरुभय्यांकडे गेले. तिला बघून हिला शास्त्रीय संगीत शिकव, असे ते म्हणाले होते. गायक कुठला का असेना, गाणं गाणाºया प्रत्येक गायकाने गाण्याचे शिक्षण घेतले पाहिजे. मगच गायनाला सुरुवात केली पाहिजे, असा अरुभय्यांचा आग्रह असायचा. 

टॅग्स :arun datearun datePuneपुणे