शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश

By विश्वास मोरे | Updated: June 30, 2024 12:42 IST

आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली

पिंपरी: आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीसाठी रविवारी सकाळी पुण्याकडे निघाली. आणि नेहमीप्रमाणे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे.

आषाढी वारी सुरू झालेली आहे. इंद्रायणी तीरावरील देहू आणि आळंदीतून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज,  ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्याकडे मार्गस्थ झालेले आहेत. गेल्या वर्षभरापासून इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मात्र, त्याचे कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए, आळंदी नगरपालिका, चाकण एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना सापडलेले नाही.

वारीच्या निमित्ताने इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते.  ते पाणी आता कमी झाले आहे. सकाळी माऊलींची पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. आळंदीतील बंधाऱ्यापासून पुन्हा इंद्रायणी नदी फेसाळले आहे. याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर प्रशासनाने नदीतील फेस कमी व्हावा यासाठी यंत्रणा सुरू केलेली आहे. 

मुख्यमंत्री जाऊन बारा तास झाले नाही, तर इंद्रायणी फेसाळली

आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी नदी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती.  व प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र,  ते जाऊन बारा तास होत नाही. तोच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे प्रशासनाला कोणतेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीEknath Shindeएकनाथ शिंदेpollutionप्रदूषणindrayaniइंद्रायणीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा