शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"...अन् प्रतिदिन राजसिंहासनावर शोभून दिसे छत्रपती शिवराय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:12 IST

गेल्या ३५० वर्षांच्या इतिहासात शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी देश व परदेशातील इतिहासकारांनी व संशोधकांनी अमूल्य लेखन केले आहे...

- हणमंत पाटील

पिंपरी : “पूर्वेकडील पर्वतांपासून ते पश्चिमेकडील समुद्रापर्यंत, तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतूपासून ते हिमालयापर्यंत असलेल्या अनेक राजांना छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतले. जिंकलेल्या भूभागाचा शेतसारा म्हणून सर्व राजांना आपल्यासाठी कर देण्यास भाग पाडले. विद्वतजनांनी घालून दिलेल्या श्रोतधर्माचा अवलंब करून छत्रपतींनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करविला. 'छत्र-चामरे आदी राज चिन्हांसह ते प्रतिदिन राज सिंहासनावर शोभून दिसू लागले', असे राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन त्यावेळी युवराज म्हणून उपस्थित असलेल्या दस्तुरखुद्द छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या ‘बुधभूषण’ या ग्रंथात केले आहे.

गेल्या ३५० वर्षांच्या इतिहासात शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी देश व परदेशातील इतिहासकारांनी व संशोधकांनी अमूल्य लेखन केले आहे. आजही तरुण इतिहास अभ्यासकांकडून त्यावर संशोधन व लेखन होत आहे. अशाच नव्या पिढीतील पुण्यातील सह्याद्री प्रतिष्ठानचे अनिल पवार यांनी वर्षभर सर्व विचारधारेच्या इतिहास संशोधकांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी लिहिलेल्या ग्रंथाचा धांडोळा घेतला. इतिहास व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या मुख्य संपादकत्वाखाली 'शिव राज्याभिषेक : मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना' हा सुमारे ५५० पानांचा ग्रंथ साकारला जात आहे. इतिहास अभ्यासक डॉ. गणेश राऊत व चेतन कोळी यांनी संपादन साहाय्य केले आहे. या ग्रंथाचे लवकरच पुण्यात प्रकाशन होणार आहे.

समकालीन व सद्य:कालीन लेखकांची गुंफून...

वि. का. राजवाडे, कृष्णराव केळुसकर, गो. स. सरदेसाई, जदुनाथ सरकार, वा. सी. बेंद्रे, य. न. केळकर, सेतु माधवराव पगडी, ग. ह. खरे अशा थोर इतिहासकारांनी शिवराज्याभिषेकाविषयी विविधांगी केलेली मांडणी व विखुरलेले लेखन एका सूत्रात गुंफले आहे. शिवाय सद्य:कालीन डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. ग. भा. मेहेंदळे, डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पवार आदी तज्ज्ञ लेखकांचे लेख या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या घटनेकडे मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाचे प्रातिनिधीक प्रतीक म्हणून पाहता येते. या घटनेवर अनेक मान्यवर इतिहासकारांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य केले. ही भाष्ये कधी एकमेकांना पूरक, तर कधी छेद देणारी ठरतात. महाराष्ट्राच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांचा सूक्ष्म अभ्यासाची मुहूर्तमेढ म्हणजे हा समग्र ग्रंथ म्हणण्यास हरकत नसावी.

-डॉ. सदानंद मोरे, ‘शिवराज्याभिषेक’ ग्रंथाचे मुख्य संपादक.

टॅग्स :PuneपुणेShivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज