शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

ब्रिटिशकालीन पुलावरची वाहतूक बंद

By admin | Published: June 26, 2017 3:34 AM

मागील वर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यात कोकणातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यावर, प्रशासन खडबडून जागे झाले. राज्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : मागील वर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यात कोकणातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यावर, प्रशासन खडबडून जागे झाले. राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरची वाहतूक तत्काळ बंद करून सर्वच पुलांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.भोर शहरातील नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावरची वाहतूक काही महिने बंद होती; मात्र पुलाचे आॅडिट झाले आहे. पूल धोकादायक आहे का नाही, याचा आॅडिट रिपोर्ट येण्याआधीच पुन्हा सुरू केला आहे. एक वर्ष होऊनही प्रशासन व बांधकाम विभाग गंभीर नाही. त्यामुळे पुलावरील वाहतुकीमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भोर-पुणे मार्गावरील नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन राणी लक्ष्मीबाई पुलाला ८४ वर्षे झाली असून पूल जीर्ण झाला आहे. या पुलाच्या मचव्यावर पिंपळ, वड व इतर झाडे उगवली आहेत. यामुळे पुलाचे मचवे खराब होऊन पूल धोकादायक बनला आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पुलाची डागडुजी केली नाही, तर धोका निर्माण होऊ शकतो.पुलाच्या दगडी बांधकामात पिंपळ, वडाच्या झाडांचे सामराज्य पसरले असून झाडांची मुळे दगडांमध्ये खोलवर रुजल्याने दगडी बांधकामाला भेगा पडत आहेत. दगडी मचवे खराब होत आहेत. पिंपळाच्या झाडांनी पिलरला विळखा घातला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यातून मोठा धोका निर्माण होऊ शकतो.