शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

पवित्र इंद्रायणी नदी रसायनयुक्त फेसाने फेसाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 11:49 IST

तीर्थक्षेत्र आळंदी : केमिकलमिश्रित पाणी काही केल्या थांबेना; उपाययोजनेची गरज

- भानुदास पऱ्हाड

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. विशेष म्हणजे थेट अधिवेशनात इंद्रायणी जलप्रदूषणाचा मांडलेला मुद्दा, नागरिकांची वारंवार उपोषणे व आंदोलने करूनही हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही.

मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायनमिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे. अगदी पाण्यावर तरंगणारा फेस पाहून समक्षदर्शींना बर्फाच्छादित भागाची आठवण होत आहे. इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दूरगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी, बोअर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तर इंद्रायणीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्या व त्यात स्नान करणाऱ्या वारकऱ्यांना पोटाचे विकार, तसेच त्वचाविकार देखील पसरण्याचा धोका संभवतो आहे. याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

 उपाययोजना कागदावर...

हिवाळी अधिवेशनात तत्कालीन आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा शासनासमोर लक्षवेधी करून मांडला होता. त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी इंद्रायणी नदीबाबत सकारात्मक पावले उचलणार असून इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही त्यावर उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन मग्न असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया स्थानिक जनतेकडून व्यक्त होत आहेत.

इंद्रायणी नदीबाबतची उदासीनता दूर होणार का?

एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा एवढीच स्थानिक जनता व वारकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे