शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा रामभरोसे; वारकऱ्यांकडून सुरक्षा पुरविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 17:15 IST

चाकण : श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या कार्तिकी वारीला पुणे -नाशिक महामार्गावरून आळंदीला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठी ...

चाकण : श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या कार्तिकी वारीला पुणे-नाशिक महामार्गावरून आळंदीला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सतत वाहनांनी वर्दळ असणाऱ्या या महामार्गावर वारकऱ्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असून, पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून केली जात आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी कार्तिकी वारीसाठी दर्शनानिमित्त हजारो वारकरी पालखीसोबत दिंड्या काढून दरवर्षी आळंदीला येतात.नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांतील दिंड्या पुणे-नाशिक महामार्गावरून आळंदीकडे प्रस्थान करत असतात. राजगुरूनगर ते आळंदी हा मार्ग अतिवर्दळीचा आणि रहदारीचा धोकादायक आहे. अपघातप्रवण पट्ट्यात दिंडीकरी जीव मुठीत धरून चालतात. दिंडीमध्ये सर्वांत पुढे पताकाधारी, त्यामागे टाळकरी, विणेकरी आणि त्यामागे तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि भाविक असा क्रम असतो. पुढे पताकाधारी चालत असल्याने दिंडी वाटचाल करीत आहे. महामार्गावर चुकीच्या बाजूने वाहन ओलांडणारी भरधाव वाहने दिंडीत घुसल्याचे आतापर्यंत झालेल्या अपघातातून लक्षात आले आहे. अनेक दिंड्या पहाटे मार्गस्थ होतात. वाहनचालकांची साखरझोपेची वेळ अपघातास कारणीभूत ठरू शकते. दरवर्षी या दिंड्यांमधील वारकऱ्यांवर अपघाताची टांगती तलवार अजूनही कायम आहे.आळंदी कार्तिकी यात्रेच्या बैठकीत दिंड्यांच्या रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांचा विषय कधीही प्राधान्याने चर्चेला येत नाही. त्यामुळे पायी चालणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याने पुणे-नाशिक महामार्गावर कार्तिकी दिंड्यांची वाट बिकट तितकीच अपघाती ठरत आहे. पंढरपूर पालखी मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करणारे सरकार इतर महत्त्वाच्या दिंडी मार्गावर साथी रस्ते सुरक्षेची आणि तात्पुरत्या सुविधा पुरवल्या जात नाही, याबद्दल वारकरी खंत व्यक्त करीत आहेत.दिंडीमधील वारकऱ्यांची स्वयंसेवकांद्वारे काळजी घेतली जाते. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका संभवतो. धर्माचे रक्षण करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या रक्षणाची जबाबदारी अथवा दखल सरकार घेत नाही, याची खंत वाटते. दिंडी मार्गावरील स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दीत वारकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याची गरज आहे.- ज्योतीताई महाराज गरुड, चाकण  

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीvarkariवारकरी