शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज ठाकरेंना भाजपात घेऊन काहीही फायदा नाही; रामदास आठवले यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 20:49 IST

राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमते पण मत किती मिळतात, हा खरा प्रश्न

पिंपरी : राज ठाकरे यांना भाजपत घेऊ नये, या विचारांचा मी आहे. त्यांच्या फक्त सभांना गर्दी जमते. मत किती मिळतात, हा खरा प्रश्न आहे. त्यांना घेऊन भाजपला काहीही फायदा नाही, अशी स्पष्ट भूमिका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड शहरात मांडली.

पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत मशिदींवरील भोंग्यांवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली. त्यावर आठवले म्हणाले, मशिदींवरील भोंगे हे मुस्लिम बांधवांची परंपरा आहे. पूर्वी हे भोंगे ऐकून आपल्याला जाग येत असे. त्यांच्या भोंग्यांसमोर हनुमान चालिसा लावणे योग्य नाही. दोन्हीही एकमेकांच्या समोर भोंगे न लावता एकमेकांना त्रास होणार नाही, असे भोंगे लावावेत. 

राज ठाकरे नाही, शिवसेना फायद्याची

शिवसेनेवर टीका करताना आठवले म्हणाले, राज ठाकरे यांचा भाजपला कोणताही फायदा नाही. त्यांची भाषणे ऐकायला लोक येतात. मत किती मिळतात, असा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपत राज ठाकरे यांना घेण्यास रिपब्लिकनचा विरोध आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती केली ही चांगली बाब नाही. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेने भाजपबरोबर यावे, मुख्यमंत्री पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्मुला करावा, यासाठी मी आग्रही आहे. १९९२ मध्ये काँग्रेस आरपीआय युतीने चमत्कार केला होता. तसाच शिवसेना आणि भाजप-आरपीआयने एकत्र येऊन सरकार स्थापावे.  

राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जातीपातीचे राजकारण करतात

राष्ट्रवादी काँग्रेस जातीपातीचे राजकारण करते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. त्यावर आठवले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करतात, असे मी म्हणणार नाही. मात्र, कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या वेळी आजूबाजूच्या गावांतील राष्ट्रवादीच्या लोकांनी जातीपातीचे राजकारण केले. राष्ट्रवादीचे स्थानिक लोक राजकारण करतात, असे माझे मत आहे. वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षात यावे, आम्ही बरोबर काम करण्यास उत्सुक आहोत.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा