शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

नाट्यातून उलगडले महिलांचे भावविश्व

By admin | Published: July 03, 2017 3:00 AM

लोकमत सखी मंच आणि कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अशा या दोघी’ नाटकास सखींचा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : लोकमत सखी मंच आणि कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अशा या दोघी’ नाटकास सखींचा उदंड प्रतिसाद मिळाला. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित हे नाटक पाहण्यासाठी सखींनी मोठी गर्दी केली होती. खचाखच भरलेले प्रेक्षागृह या दोन अंकी नाटकात स्त्रियांचे भावविश्व उलगडण्यात आले.  माधव (सुजीत देशपांडे) आणि माया (ऋचा श्रीखंडे) हे तरूण जोडपे यांच्याभोवती नाटकाची कथा आहे. माधव मध्यमवर्गीय क़ुटूंबातील, साध्या विचारांचा तर माया श्रीमंत घरात वाढलेली उच्च विचार करणारी अशी विसंगत परिस्थिती असताना, माधव वेळोवेळी तडजोडी कशा करतो.माया आणि माधव या दोघांच्या विचारात मोठी तफावत तरिही माधव आयुष्य आनंदित करण्याचा कसा प्रयत्न करतो. कोणत्याही परिस्थितीत, तडजोड स्विकारून परिस्थितीवर मात करणे हाच गुण हेरुन मायाने माधवशी लग्न केलेले असते.दोन टोकाच्या परिस्थितीतील व्यकती एकत्र येतात. त्यांच्यात छोट्या मोठ्या गोष्टींवरून उद्भवणारा वाद कसा असतो. वैचारिक मदभेदामुळे कौटुंबिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो. ऐकमकांमध्ये क्षुल्लक कारणावरून कसा दुरावा निर्माण होतो. त्यातील कलह, वैचारिक मतभेद यातून प्रेक्षकांनाही धडा घेण्यासारखे बरेच काही मिळाले. नाटकातील दुसरे जोडपे म्हणजे विश्वनाथ (निखिल केंजळे) आणि प्रतिभा (किरण नागपुरे) होय. या जोडप्याच्या माध्यमातून नाटकात महिलेला घरात कशी वागणूक दिली जाते. एक महिला ही माणूस नसून केवळ उपभोगाची वस्तू आहे, अशा पद्धतीने तिला दिली जणारी वागणूक याचे वास्तव या नाट्यप्रयोगात एका जोडप्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे मांडले आहे. स्त्रीला सन्मानाची वागणूक दिली जात नाही. समाजव्यवस्थेत अद्यापही स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते. हे नाटकातील दृश्य पाहून प्रेक्षकांचे मन सुन्न होते. विश्वनाथकडून प्रतिभाला पत्नी म्हणुन वागणूक कशी मिळाली. हे पाहत असताना,नाटकातील आणखी दोन पात्र माधवचा मित्र वसंता आणि मायाचा बॉस या दोन व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. स्त्री पुरूषांमधील वैचारिक मतभेद किती टोकाला गेले तरी हे नाजूक नाते कसे जपावे, याविषयी या व्यक्तिरेखा बरेच काही सांगून जातात नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर आणि प्रशांत गिरमकर हे दिग्दर्शक आहेत. लेखक गवाणकर यांनी समजातील वास्वव आपल्या लेखणीतून नाट्यरूपात उतरिवले आहे. तर दिग्दर्शक गिरमकर यांनी हे वास्तव रंगमचांवर यशस्वीपणे उतरविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयाचे दर्शन घडविले आहे. कार्यक्रमास पुष्पा गव्हाणे, गीतल गोलांडे उपस्थित होत्या.लोकमतने सखी मंचच्या माध्यमातून एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महिलाप्रधान नाटक म्हणून ‘अशा या दोघी’ या नाटकाची निवड केली. नाटक हे असे एक माध्यम आहे, त्यातून मनोरंजनच नव्हे तर प्रबोधनाचे ते एक साधन आहे. अशा या दोघी या नाटकात महिलांच्या दोन टोकांच्या विचारसरणी कशा असतात, याचे सादरीकरण अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यात आले आहे.- भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद