शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

बिहारमध्ये NDAचाच बोलबाला, 40 पैकी 34 जागांवर मिळवणार कब्जा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 20:20 IST

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे.

नवी दिल्लीः गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. राहुल गांधी आणि मोदी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्याचदरम्यान अनेक संस्थांनी सर्व्हे करण्यासही सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि नील्सननं निवडणूकपूर्व सर्व्हे केला असून, उत्तर बिहारमधल्या 12 पैकी 11 जागांवर एनडीए विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. या 40 मतदारसंघांतल्या 10 हजार 212 लोकांची मतं जाणून घेतली आहे.उत्तर बिहारमधल्या 12 पैकी 11 जागांवर एनडीएचा विजय होणार आहे, असं सर्व्हेत म्हटलं आहे. वाल्मिकीनगर, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, शिवहर, मुजफ्फरपूर, वैशाली, हाजीपूर, सारण, सीवान, महाराजगंज, गोपालगंज या मतदारसंघांमध्ये भाजपा विजयी होण्याची शक्यता असून, सीतामढीची जागा यूपीएकडे जाण्याची शक्यता आहे. तर बिहारच्या मिथिलांचल क्षेत्रातील नऊच्या नऊ जागांवर एनडीएचा विजय होण्याचा अंदाज आहे. सुपौल, मधेपुरा, खगडिया, बेगुसराय, झंझारपूर, मधुबनी, दरभंगा, समस्तीपूर आणि उजियारपूरमधून एनडीएला विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे.

बिहारमध्ये 40 जागांपैकी 35हून जास्त जागा एनडीए जिंकण्याचा आडाखे बांधले जात आहेत. तर बिहारच्या सीमांचल पूर्व बिहारमध्ये 7 जागांपैकी चार जागा एनडीए जिंकणार असल्याचा दावा केला जातोय. तर यूपीएसुद्धा 3 जागांवर विजय मिळवू शकते. सर्व्हेनुसार, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, जमुई या जागांवर एनडीएचा विजय होणार असून, अररिया, भागलपूर आणि बांका जागेवर यूपीएचं खातं उघडणार आहे. एबीपी-नील्सनने हा सर्व्हे 17 ते 26 मार्चदरम्यान केला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019