शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 11:25 IST

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, असे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, असे म्हटले होते. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी सदिच्छा व्यक्त केली होती. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यबाबत आशावादी असायला काहीच हरकत नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. (amol kolhe react over uddhav thackeray to become prime minister)

दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचे स्वप्न साकार करावे. त्यांनी भविष्यात पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी सदिच्छा राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली होती. तसेच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या. यावर आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर खासदार झालेल्या अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

अभिमानच असेल, आनंदच होईल

संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणतीही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली, तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला आहे, असे अमोल कोल्हे यांनी नमूद केले. 

आता लसींचे दर वाढले; कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवे दर जाणून घ्या

विरोधी पक्षाने एकत्र येणे हे आशादायी चित्र 

संजय राऊत यांनी जो आशावाद व्यक्त केला, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. परंतु, सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल, हे माहिती नाही. मात्र, तीही महत्त्वाची असेल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. देशाच्या दृष्टीने विरोधकांचा चेहरा कोण हा मुद्दा गौण ठरत असून, सरकारच्या एक कलमी कार्यक्रमाला चाप बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे या परिस्थितीत विरोधी पक्षाने एकत्र येणे हे आशादायी चित्र आहे, असे कोल्हे यांनी सांगितले. 

“कोरोना संकटकाळात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही”: अमेरिका

दरम्यान, पेगॅसेस, कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढलेली महागाई, कृषी कायदे या विषयांवर संसदेत चर्चा झाली पाहिजे. सरकार म्हणत असेल की, सभागृहात काम रेटून नेऊ पण आमचा याला जोरदार विरोध असेल, असे कोल्हे म्हणाले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेprime ministerपंतप्रधानShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSanjay Rautसंजय राऊत