शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जनतेत मोदी विरोधी सुप्त लाट : नितीन राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:52 IST

राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या, सामुहिक उन्मादामुळे (मॉब लिंचिंग) हत्यांकडाच्या घटनांत वाढ झाली, पुरोगामी विचारवंतांच्या हत्या होऊ लागल्या, देशात काळे धन येण्या ऐवजी नोटबंदीमुळे काळ््याचे पांढरे केले गेले. अशा सर्व घटनांमुळे प्रचारातून विकासाचा मुद्दा हद्दपार झाला आहे. त्यामुळे लोकांना आता मोदी नकोसे झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरात मोदी विरोधी सुप्तलाट असल्याचे मत कॉंग्रेसच्या दलित सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि रोजगार हमीचे माजी कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.     राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे. जम्मू कामीर येथील ३७० कलम काढून टाकणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायदा सरकार आणू पहात आहे. ईशान्य भारताला देखील ३७० कलमासारखा विशेष दर्जा आहे. तेथे मात्र, मोदी वेगळी भूमिका घेताना दिसतात. उलट ईशान्य भारतात वेगळा ध्वज देण्यासही ते तयार आहेत. देशामधे नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्या पुरोगामी आणि विचारवंतांची हत्या होत आहे. गो मांस बाळगल्याच्या संशयावरुन लोकांना मारले जात आहे. सामाजिक उन्मादाच्या घटनांतही वाढ झाली आहे. या सर्वांमुळे नागरिक मोदींविरोधात जाऊ लागले आहेत. त्यामुळे, देशभरात मोदींविरोधात लाट दिसून येत आहे. अगामी लोकसभेच्या निवडणूकीत मोदींविरोधात मतासाठी नागरिक बाहेर पडत असल्याचे राऊत म्हणाले. भाजपाच्या फायद्यासाठीच आंबेडकर आले नाहीत

भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाच ते सहा जागा देण्यास आघाडीची तयारी होती. मात्र, त्यांनाच सोबत यायचे नव्हते. त्यांची भूमिका संविधान विरोधी दिसत आहे. अन्यथा भाजपाचा पराभव करण्यासाठी ते आघाडीसोबत असते. उलट, भाजपाच्या फायद्यासाठीच ते आघाडीसोबत आले नसल्याची टीका नितीन राऊत यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Rautनितीन राऊतBJPभाजपा